चोली के पिछे क्या है म्हणणाऱ्या नीना गु्प्तांनी किती केली लग्न? आत्मचरित्रात झाला खुलासा

अवघे एक वर्षचं टिकलं लग्न.... या कारणामुळे वेगळे राहण्याचा घेतला निर्णय

Updated: Jun 16, 2021, 05:53 PM IST
चोली के पिछे क्या है म्हणणाऱ्या नीना गु्प्तांनी किती केली लग्न? आत्मचरित्रात झाला खुलासा title=

मुंबई : नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या आपल्या ऑटोबायोग्राफीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या ऑटोबायोग्राफीमध्ये नीनाने आपल्या खासगी आयुष्याबाबत मोठे खुलासा केले आहेत. चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. 'सच कहूं तो' या नीना गुप्ता यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी खूप मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. नीना यांचं लग्न हे कायमच चर्चेत राहिलेला विषय आहे. नीना यांनी विवेक मेहरा यांच्या अगोदर आणखी एका व्यक्तीशी लग्न केलं होतं. 

नीना गुप्ता यांनी 2008 मध्ये  विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं आहे. मात्र या अगोदरही नीना गुप्ताचं लग्न झालं होतं. मात्र हे लग्न एक वर्षही टिकलं नाही. दोघं लग्नानंतर एका वर्षातच वेगळे झाले. 

नीनाने आपल्या ऑटोबायोग्राफीत दिलेल्या माहितीनुसार, अमलन कुसुम नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. त्यावेळी ते आयआयटीमधील विद्यार्थी असून संस्कृतमध्ये मास्टर्स करत होते. नीना गुप्ता यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल खुलासा करताना म्हटलं की, अमलन कॅम्पसमध्ये राहत असे. तर त्याचे पालक दुसऱ्या शहरात राहत असे. मात्र त्याचे आजोबा आमच्या येथे राहत असतं. आणि तो सुट्यांच्यावेळी किंवा सणाला आमच्याकडे येत असे. 

नीना आणि अमलन यांचं लग्न फक्त एक वर्षचं टिकलं

नीना यांच्या एका मित्राने या दोघांच्या नात्याबद्दल पालकांसमोर खुलासा केल्यावर ही गोष्ट बाहेर आले. मात्र या दोघांच्या नात्यावर याचा कोणताच परिणाम झाला नाही. यानंतर नीना यांना अमलनसोबत श्रीनगरला जाण्याची परवानगी मिळाली आणि दोघांनी लग्न केलं. मात्र त्यानंतर या दोघांना जाणीव झाली की, आपण एकमेकांसाठी नाहीच आहोत. नीनाने सांगितलं की, अमलन आणि माझा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. त्याला असं वाटत असे की, नीना यांनी कायम आपल्या कुटुंबावर फोकस करावं. मात्र नीना यांना काम करायचं होतं. नीना यांना फक्त हाऊस वाईफ नव्हतं व्हायचं. नीना यांना आयुष्याकडून बरंच काही हवं होतं. थिएटर करायचं होतं. 

सतीश कौशिक यांना देखील करायचं होतं लग्न 

नीना क्रिकेटर विवियन रिचर्डससोबत रिलेशनशिपमध्ये होती. नीना रिचर्डमुळे लग्न न करताच गरोदर राहिली. लग्न न करताच नीनाने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. अशावेळी सतिश कौशिक यांनी नीनाला दिलासा दिला. जर बाळं काळ्या रंगाचं झालं तर हे मुलं माझं असल्याचं सांग. आपण लग्न करू, असा शब्द सतिश कौशिक यांनी दिला होता.