कंगना रानौतने सगळ्यांसमोर का मागितली अजमाची माफी?

झीशान खानने कंगना राणौतच्या 'लॉक अप' शोला अलविदा केलं.

Updated: Apr 24, 2022, 02:51 PM IST
कंगना रानौतने सगळ्यांसमोर का मागितली अजमाची माफी? title=

मुंबई : अलीकडेच झीशान खानने कंगना राणौतच्या 'लॉक अप' शोला अलविदा केलं. गेल्या आठवड्याच्या एका एपिसोडमध्ये, झीशान खानचं आझम फलाहशी भांडण झालं ज्याचा त्याला फटका सहन करावा लागला आणि त्याला लगेचच शोमधून बाहेर काढण्यात आलं.

या संपूर्ण प्रकरणावर शोचा जेलर करणने प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तर आता कंगनानेही आजमाची माफी मागितली आहे. अल्ट बालाजीने आपल्या इंस्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये कंगना सर्वांसमोर आजमाची माफी मागताना दिसत आहे. यादरम्यान कंगना झीशानवर ताशेरे ओढते आणि आजमाला सपोर्ट करते.

अभिनेत्री म्हणते, 'मी सोमवारचा एपिसोड माझ्या मनातून काढू शकत नाही. त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. आजमा मी शारीरिक हल्ल्याबद्दल तुझी माफी मागते. तुला खरोखरच इतर सर्वांची माफी मागावी लागेल, कारण रिअॅलिटी शोमध्ये फक्त माणुसकीच दाखवली जाते. झीशानने माझी खूप निराशा केली आहे. त्याचा मला खूप रागही येत आहे.

कंगना पुढे म्हणाली, 'अंजली अरोरा, तू ट्रायललाही टार्गेट केलंस, थोडासा ओरखडा आल्यानंतरही तू रडलीस. या प्रकरणात तु आजमाचे ब्युटी प्रोडक्ट्सदेखील नष्ट केलेस. तुला नाही वाटत का की गोष्ट तिच्यासाठी  महत्त्वाची ठरली असती? मी तुम्हाला 3 इशारे दिले, तरी तु याकडे दुर्लक्ष केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फक्त पायल रोहतगी आणि शिवम शर्मा यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, तुमचा प्रतिक्रिया छान आहे. आपण समर्थन केलं हे खूप चांगलं आहे. अंजली, तू बदला घेण्याच्या स्थितीत आहेस आणि नेहमी तुझी निराशा दूर करण्याचा प्रयत्न करते. म्हणून मी तुला जेलची  शिक्षा देते.