'प्रवास संपला...', 'कुण्या राजाची तू गं राणी' मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कुण्या राजाची तू गं राणी' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर अनेक कलाकार भावूक झाले. 

Updated: Mar 16, 2024, 11:14 PM IST
'प्रवास संपला...', 'कुण्या राजाची तू गं राणी' मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, कलाकार भावूक title=

Kunya Rajachi Ga Tu Rani : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कुण्या राजाची तू गं राणी' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. काही महिन्यांपूर्वीच ही मालिका सुरु झाली होती. मात्र काही कारणात्सव या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. शनिवारी 16 मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर अनेक कलाकार भावूक झाले. या मालिकेतील कबीर हे पात्र साकारणार अभिनेता हर्षद अतकरी, गुंजा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्वरी जोग आणि बाभळी हे पात्र साकारणारी अभिनेत्री समिधा गुरु यांनी भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत. 

हर्षद अतकरीची पोस्ट

'कुण्या राजाची तू गं राणी' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. नुकतंच अभिनेता हर्षद अतकरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या पात्राचे फोटो शेअर केले आहेत. 'प्रत्येक कथेचा, प्रत्येक पात्राचा स्वतःचा एक प्रवास असतो... कबीरचा प्रेक्षकांसोबतचा प्रवास संपत आला आहे... मी आतापर्यंत साकारलेल्या अनेक पात्रांपैकी हे पात्र सर्वात जोखमीचं आणि गुंतागुंतीचं होतं हे मला मान्य आहे. खूप खूप धन्यवाद स्टार प्रवाह मला ही संधी दिल्याबद्दल. कबीर आणि 'कुण्या राजाची तू गं राणी' प्रेक्षकांच्या हृदयात कायम राहतील याची मला खात्री आहे... नवीन कथेपर्यंत, नवीन व्यक्तिरेखेपर्यंत अलविदा... ती लवकरच माझ्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी आशा आहे, असे हर्षद अतकरी म्हणाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Harshad Atkari (@harshad_atkari)

शर्वरी जोग भावूक

तर या मालिकेतील गुंजा या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. अभिनेत्री शर्वरी जोगने गुंजा या पात्राचा निरोप घेतला. तिने याबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'गुंजा, आज 'कुण्या राजाची गं तू राणी' मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होतोय. या मालिकेने मला खूप काही दिलं. खूप चांगली माणसं, खूप अनुभव. गुंजाकडून तर शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. गुंजाने मला अभिनेत्री म्हणून किती समृद्ध केलं हे माहिती नाही, पण माणूस म्हणून तिने मला नक्कीच खूप गोष्टी शिकवल्या. आज प्रवास जरी थांबत असला तरी गुंजा आणि तिचं सगळं कुटुंब कायम माझ्या आठवणीत राहील. गुंजावर, या मालिकेवर, तिच्या कुटुंबावर तुम्ही जसं भरभरून प्रेम केलं तसंच प्रेम यापुढेही कराल हे नक्की.' असे शर्वरी जोगने म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharvari Jog (@sharvari_jog)

समिधा गुरु काय म्हणाली?

त्यासोबतच समिधा गुरुने या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना ती भावूक झाली. कुण्या राजाची ग तू राणी, बाभळीचा प्रवास आज संपला. ह्या प्रवासात अनेक छान मित्र मैत्रिणी भेटलेत.. एक नवीन कुटुंब तयार झालं..तुम्हा रसिकानीही आमच्यावर आमच्या मालिकेवर भरभरून प्रेम केलं त्याबद्दल शतशः ऋणी आहोत. एका वेगळ्या धाटणीची भूमिका करायला मिळाली त्याबद्दल स्टार प्रवाहचे आणि सोबो फिल्म्स चे मनापासून धन्यवाद. लवकरच एका नवीन भूमिकेत भेट होईलच तोपर्यंत सगळ्यांना खूप प्रेम, असे समिधा गुरु म्हणाली. 

दरम्यान 'कुण्या राजाची गं तू राणी' ही मालिका 18 जुलैपासून सुरु झाली होती. या मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी हा कबीर या प्रमुख भूमिकेत झळकत होता. तर अभिनेत्री शर्वरी जोगने यात गुंजा हे पात्र साकारले होते. यात गुंजा आणि कबीर यांची गोष्ट दाखवण्यात आली होती.