...तर दीपिका नाही ऎश्वर्याने साकारली असती ‘पद्मावती’

बॉलिवूड अभिनेत्री ऎश्वर्या राय बच्चन ही आज ४४वां वाढदिवस साजरा करत आहे. यादिवसाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला अशी एक खास गोष्ट सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही याआधी ऎकली किंवा वाचली नसेल.

Updated: Nov 1, 2017, 10:45 AM IST
...तर दीपिका नाही ऎश्वर्याने साकारली असती ‘पद्मावती’ title=
Image Credit - YouTube

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऎश्वर्या राय बच्चन ही आज ४४वां वाढदिवस साजरा करत आहे. यादिवसाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला अशी एक खास गोष्ट सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही याआधी ऎकली किंवा वाचली नसेल.

दिग्दर्शक संजय लीला भन्साली हे ‘पद्मावती’मध्ये दीपिका पादुकोनला राणी पद्मावतीच्या रूपात सादत करत आहेत. पण सलमान खान आणि ऎश्वर्या राय यांच्यात सगळं ठिक असलं असतं तर हा सिनेमा खूप आधी तयार झाला असता. आणि दीपिका पद्मावती होऊ शकली नसती. 

Aishwarya Rai

मीडिया रिपोर्टनुसार, संजय लीला भन्साली हे हा सिनेमा सलमान खान आणि ऎश्वर्या रायला घेऊन करणार होते. दोन्ही कलाकारांनी ‘पद्मावती’साठी होकरही दिला होता. पण ऎनवेळी ऎश्वर्याने भन्साली यांच्यासमोर ठेवलेल्या अटीमुळे सगळा प्लॅन बिघडला आणि सिनेमा सुरू झाला नव्हता. 

Aishwarya Rai

आता हे स्पष्ट झालंय की, ‘पद्मावती’साठी भन्सालींची पहिली पसंत ही ऎश्वर्या आणि सलमान ही जोडी होती. पण आता हा सिनेमा रणवीर सिंह, दीपिका आणि शाहीद कपूर या कलाकारांच्या भूमिकांनी सजला आहे. येत्या १ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

Aishwarya Rai

दरम्यान, संजय लीला भन्साली जेव्हा हा सिनेमा करणार होते, तेव्हा सलमान आणि ऎश्वर्या यांच्यात भांडण झालं होतं. त्यासोबतच ऎश्वर्याने भन्साली यांच्याकडे एक अटही घातली होती. ऎश्वर्याने अट घातली होती की, हा सिनेमा मी करायला तयार आहे पण अलाउद्दीन खिलजीची भूमिका सलमान खानने साकारावी.

Aishwarya Rai

म्हणजे या सिनेमात सलमान आणि ऎश्वर्या यांच्यात एकही सीन्स नसेल. ही अट सलमान खानला मान्य नव्हती. झालं इथेच माशी शिंकली आणि हा सिनेमा इथे बंद पडला.