सलमानमुळे आमिरला पश्चाताप; नात्यात दुरावा ? 

 बॉलीवूड इंडस्ट्रीत सुपरस्टार खानच्या चौकटीत असणं ही मोठी गोष्ट मानली जाते. 

Updated: Jan 14, 2022, 04:48 PM IST
सलमानमुळे आमिरला पश्चाताप; नात्यात दुरावा ?  title=

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीत सुपरस्टार  खानच्या चौकटीत असणं ही मोठी गोष्ट मानली जाते. मग तो शाहरुख खान आणि सलमान खानचा 'करण अर्जुन' असो किंवा आमिर खान आणि सलमान खानचा 'अंदाज अपना अपना'. हे चित्रपट लोकांना खूप आवडले. या चित्रपटाद्वारे आमिर खान आणि सलमान खान यांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष खास स्थान निर्माण केलं.

पण या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान या दोन स्टार्समधील प्रकरण थोडंसं चिघळलं होतं. वास्तविक, पडद्यावर सलमान आणि आमिरची केमिस्ट्री दिसली होती. पण ऑफस्क्रीन हे प्रकरण विरुद्ध होतं. याबाबतचा खुलासा खुद्द आमिर खानने केला होता. आमिर खान एकदा सलमान खानच्या वागण्याबद्दल बोलला होता. त्यावेळी आमिर खानला सलमान खानची वृत्ती आवडली नव्हती. असं त्याने सांगितलं होतं.

सलमान खानच्या वागण्यावर आमिर खान बोलला
आमिरने तर सलमान खानपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचही सांगितलं होतं. 1994 मध्ये सलमान आणि आमिरने अंदाज अपना अपना या चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांनाही कास्ट करण्यात आलं होतं. एकीकडे आमिर आणि सलमानमधील हे प्रकरण बरोबर नसताना. त्याचबरोबर रवीना आणि करिश्मा यांच्यातही जोरदार भांडण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

मला तेव्हा सलमान खान आवडत नव्हता- आमिर’
2013 मध्ये आमिर खान करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये आला होता. या टॉक शोमध्ये आमिरने खुलासा केला की, त्याला त्यावेळी सलमान खानची वृत्ती आवडली नव्हती. आमिर खान म्हणाला होता, 'अंदाज अपना अपनामध्ये सलमानसोबत काम करण्याचा माझा अनुभव फारसा चांगला नव्हता, तेव्हा मला सलमान आवडत नव्हता. सलमान खान खूप असभ्य आहे हे मी त्यावेळी पाहिलं. तो लक्ष देत नाही. सलमानसोबत काम केल्यानंतर मी एक गोष्ट मनात पक्की केली होती की, मला सलमानसोबत पुन्हा काम करायचं नव्हतं.

अशी झाली सलमान आणिआमिरची मैत्री
मात्र, नंतर दोघंही मित्र बनल्याचं आमिरने पुढे सांगितलं, आमिरने कबूल केलं होतं की, 2002 मध्ये जेव्हा तो त्याच्या कठीण टप्प्यातून जात होता तेव्हा सलमाननेच त्याला साथ दिली होती. त्यावेळी आमिर त्याची पहिली पत्नी रीना दत्तपासून विभक्त झाला होता. त्यावेळी सलमाननेच आमिरला खांदा दिला होता. त्यावेळी तो खूप दु:खी असायचा असं आमिरने सांगितलं होतं. तिथून या दोघांची खरी मैत्री सुरू झाली.