कॉलेजमध्ये असताना कोणी प्रपोज केलं का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा

'बस बाई बस' शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 12, 2022, 03:02 PM IST
कॉलेजमध्ये असताना कोणी प्रपोज केलं का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा title=

मुंबई : ‘झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आत पर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. कार्यक्रम प्रदर्शित होण्याआधी त्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. यावेळी कॉलेजमधील मज्जा आणि यासोबत त्यांना कोणी प्रपोज केलं या विषयी खुलासा केला आहे. 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

प्रेक्षक महिला सेलिब्रेटी पाहुणीला भन्नाट प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात. यावेळी शोमध्ये पंकजा मुंडे त्यांच्या खासगी आयुष्याबाबत आणि राजकीय परिस्थितीबाबत तिथे चर्चा करण्यात आली. नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला असून यात पंकजा त्यांच्या कॉलेजच्या काळातील दिवसांबाबत सांगताना दिसल्या. यावेळी प्रेक्षक महिलांपैकी एका महिलेने तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का असा प्रश्न विचारला.

या प्रश्नाचं उत्तर देताना पंकजा हसत म्हणाल्या, 'अजिबात नाही. तो सुखद क्षण मला अनुभवताच आला नाही.' पंकजा यांनी दिलेल्या या उत्तराने तिथे उपस्थितीत असलेले सगळे लोक हसू लागले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे.' यावर नेटकरी विविध प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.

आणखी वाचा : 'हर हर शंभू' फेम फरमानी नाझचं गाणं Youtube वरून हटवण्याच कारण समोर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

आणखी वाचा : 'तू तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारल्यास, पण...', कियारा अडवाणीची सिद्धार्थ मल्होत्रासाठीची Cryptic Post चर्चेत

पुढे पंकजा यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांविषयी विचारण्यात आला, तेव्हा त्या भन्नाट उत्तर देत म्हणाल्या, 'माझ्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये मुंडे साहेब गृहमंत्री होते. त्यांच्याबरोबर सुरक्षारक्षक असायचे. त्याचबरोबरीने माझ्याबरोबरही तेव्हा सुरक्षारक्षक होते. त्यामुळे मला कॉलेजच्या दिवसांची मजा घेताच आली नाही. सुरक्षारक्षक बघूनच लोक घाबरायचे. पण एकदा कोणाशी मैत्री झाली की ती शेवटपर्यंत असायची.'