घटस्फोटानंतर अभिनेत्रींनी बॉयफ्रेंडसोबत थटला नवा संसार, तर काहींनी मात्र....

घटस्फोटानंतर अभिनेत्रींचा मोठा निर्णय, बॉयफ्रेंडसोबत थटला नवा संसार, तर काहींनी मात्र लग्नाआधीचं दिला बाळाला जन्म   

Updated: Feb 22, 2022, 09:25 AM IST
घटस्फोटानंतर अभिनेत्रींनी बॉयफ्रेंडसोबत थटला नवा संसार, तर काहींनी मात्र.... title=

मुंबई : झगमगत्या विश्वात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या समोर आल्यानंतर सेलिब्रिटींच्या चाहत्यांना मोठा धक्का बसतो. त्यातील एक म्हणजे त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या नात्यात आलेला दुरावा. बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नातं संपेल आणि कधी दुसऱ्यासोबत नाव जोडलं जाईल याबद्दल काही सांगता येत नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी घटस्फोटानंतर लिव्ह इनमध्ये राहण्यास पसंत केल, तर काहींनी लग्न केलं. 

अभिनेत्री मलायका अरोरा
अभिनेत्री मलायका अरोरा घटस्फोटानंतर अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलायकाने जवळपास 18 वर्षांनंतर अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिला. 

अभिनेत्री काम्या पंजाबी
काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगी देखील आहे. काम्या आणि बंटीने 10 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर काम्याने डॉक्टर शलभ डांगसोबत लग्न केलं. शलभचं देखील काम्यासोबत दुसरं लग्न आहे. शलभला देखील मुलगा आहे. 

अभिनेत्री कल्की केक्ला
कल्कीने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केलं. पण हे लग्न जास्त काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर कल्की गाय हर्षबर्गला डेट करत आहे. लग्नापूर्वीचं कल्कीने मुलीला जन्म दिला आहे. 

अभिनेत्री पूजा बत्रा
अभिनेत्री पूजा बत्रा सध्या अभिनेता नवाब शाहसोबत वैवाहिक जीवन जगत आहे. याआधी 2002 साली पूजाने सर्जन सोनू अहलूवालियासोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं फरा काळ टिकू शकलं नाही.

रश्मी देसाई
अभिनेत्री रश्मी देसाई घटस्फोटानंतर अरहानसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. याआधी तिने 2012 साली अभिनेता नंदीश सिंग संधूसोबत लग्न केलं. पण त्यांनी 2016 साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला.