अक्षय कुमारला का मागावी लागली चाहत्यांची माफी, जाणून घ्या

अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Updated: Nov 13, 2022, 08:19 AM IST
अक्षय कुमारला का मागावी लागली चाहत्यांची माफी, जाणून घ्या title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत नाही आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या की 'हेरा फेरी' (Hera Pheri) फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अक्षय कुमारच्या जागी अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aryan)  घेतले आहे. प्रेक्षकांना ही बातमी मिळाल्यापासून सोशल मीडियावर या विषयी चर्चा सुरु झाली. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयनं 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) विषयी अनेक खुलासे केले आहेत. 

काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' तिसऱ्या भाग येणार नसल्याची पुष्टी केली. आता अक्षयनं 'हिंदुस्तान टाइम्स'च्या लीडरशिप समितीत हे मान्य केलं आहे की 'हेरा फेरी 3' विषयीही चर्चा केली. यावेळी अक्षय म्हणाला की, 'हेरा फेरी 3 निर्मात्यांच्या आणि त्याच्या मतभेदांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हेरा फेरी हा माझ्या करिअरचा एक मोठा भाग आहे. या चित्रपटासोबत माझ्या अनेक चांगल्या आठवणी आहेत. तिसरा भाग होऊ शकला नाही याचेगी मला वाईट वाटते.' पुढे अक्षय म्हणाला की, 'आपण वेगळ्या प्रकारे विचार सुरु करायला हवं असं मला वाटतं.' (Akshay Kumar himself left Hera Pheri 3 Apologizing to the fans he said because of this thing )

अक्षय कुमारला मिळाली होती ऑफर

'हेरा फेरी 3' विषयी खुलासा करत अक्षय म्हणाला, 'मला चित्रपटाची ऑफर मिळाली होती आणि मला याविषयी सगळं नीट सांगण्यात आलं होतं. पण त्याचा स्क्रीनप्ले, स्क्रिप्ट आणि सर्व काही बघून मला समाधान मिळू शकलं नाही, त्यात आनंदही झाला नाही. लोकांना जे पहायचे आहे तेच मला करायचे आहे आणि म्हणूनच मी मागे हटलो... तो पुढे असेही म्हणाला, 'मलाही खूप वाईट वाटतं, ज्याप्रकारे गोष्टी घडत आहेत त्यावरून मी खूश नाही, म्हणूनच मी न करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाने ठरवले आहे.'