Aishwarya Rai Bachchan Divorce: अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंब चर्चेत आहे. ज्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे नाते. या दोघांचा घटस्पोट होणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू होती. या अफवांना जास्त उधान आले ते अभिषेकच्या ऐश्वर्या प्रति असलेल्या वागणूकीमुळे, असे त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या घटस्पोटाबाबतची पोस्ट लाईक केली होती आणि त्यानंतर ते दोघे बिना वेडिंग रिंगचेही दिसले. नंतर ऐश्वर्याही आपली मुलगी आराध्यासोबत अनेक ठिकाणी एकटीच दिसली.
असे अनेक व्हिडीओ रिलीज झाले आणि त्यावरून सगळ्यांचा असा समज झाला की ते दोघे घटस्पोट घेण्याचा विचार करत आहेत. यावर त्या दोघांनीही काही व्यक्तव्य केले नव्हते. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ ऐश्वर्याचा असून त्यात ती आपल्या घटस्पोटाच्या अफवांवर एका वेगळ्या अंदाजात व्यक्त होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती पॅरिसमध्ये असून तिच्या हातात आपल्या लग्नाची अंगठी आहे.
Aishwarya rai back with her wedding ring at Paris fashion week.
byu/FilmyInsaan inBollyBlindsNGossip
ऐश्वर्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहते सुटकेचा नि:श्वास सोडत आहेत. घटस्फोटाच्या सगळ्या चर्चा या फक्त अफवाच आहेत आणि त्यात काही तथ्य नाही असा अंदाज चाहते लावत आहेत. ऐश्वर्याचा हा व्हिडिओ Reddit वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये 'ऐश्वर्या राय पॅरिस फॅशन वीकमध्ये तिच्या लग्नाची अंगठी परिधान करताना दिसली होती'. असे लिहिण्यात आले आहे. याआधी पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय आपली मुलगी आराध्यासोबत दिसली होती. त्यानंतर तिथल्याच एका व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने तिच्या लग्नाची अंगठी आपल्या हातात घातल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओच्या माध्यमातून ती घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम देताना दिसत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत. लग्नाच्या काही वर्षांनी त्यांना पहिली मुलगी झाली. जिचे नाव आराध्या आहे. आता आराध्या मोठी झाली असून तिच्यात ऐश्वर्याची झलक पहायला मिळते. आराध्या बहुतेक प्रसंगी आपली आई ऐश्वर्यासोबत दिसते, पण अभिषेक बच्चन त्यांच्या सोबत दिसत नाही. याउलट तो आपल्या कुटुंबासोबत अनेक ठिकाणी स्पॉट होतो. पण ऐश्वर्या आणि आराध्या या दोघी एकट्याच दिसतात. या वर्षाच्या सुरुवातीला ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही अंबानींच्या लग्नाला गेले होते, मात्र तिथे ते स्वतंत्रपणे दिसले. दोघेही त्या लग्नानंतर भेटले होते, पण ऐश्वर्या एकटीच सुट्टीवर गेली होती, या प्रकारामुळेच त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना जोर आला होता.