'त्या' रात्री असं काय घडलं की, ऐश्वर्या-सलमानचं नातं कायमचं संपलं

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची बरीच चर्चा आहे. बॉलिवूडचे हे लव्ह बर्ड जवळपास साडेतीन वर्षे एकत्र राहिले.

Updated: Nov 2, 2021, 06:31 PM IST
'त्या' रात्री असं काय घडलं की, ऐश्वर्या-सलमानचं नातं कायमचं संपलं title=

मुंबई : आपल्या निळ्या डोळ्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या ऐश्वर्याचे अनेक चाहते आहेत. आज जरी ती फार कमी सिनेमात दिसत असली तरी. एक काळ असा जेव्हा तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु ऐश्वर्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअरमुळे जास्त चर्चेत होती. त्यात एक काळ असा होता की, जेव्हा ऐश्वर्याचे नाव सलमानसोबत जोडले गेले होते आणि दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते.

'हम दिल दे चुके सनम.' या चित्रपटानंतर सगळेच सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या जोडीच्या प्रेमात पडले. दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत आहेत हे कळल्यावर हिंदी चित्रपटांचा प्रत्येक चाहते अधिक आनंदी झाले. सलमान आणि ऐश्वर्याची जोडी बॉलिवूडची सर्वात लाडकी जोडी ठरली. पण काळाच्या ओघात त्यांच्या नात्यात अशी कटुता आली की आज दोघांना एकमेकांचे नाव घेणेही आवडत नाही.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची बरीच चर्चा आहे. बॉलिवूडचे हे लव्ह बर्ड जवळपास साडेतीन वर्षे एकत्र राहिले. 2002 मध्ये ऐश्वर्याने सलमानवर मारहाणीचा आरोप केला तेव्हा नात्याचा पायाच डळमळीत झाला होता. सलमानने हे आरोप कधीच मान्य केले नाहीत.

मध्यरात्री ते हाय व्होल्टेज ड्रामा

ऍश आणि सलमानच्या नात्यातील कटुता 2001 मध्येच सुरू झाली. नोव्हेंबर महिना होता. रात्री उशिरा सलमान ऐश्वर्याच्या अपार्टमेंटबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा करताना दिसला. तेथे उपस्थित लोकांनी सांगितले की, सलमान रागावला होता आणि तो सतत ऐश्वर्याच्या घराचा दरवाजा वाजवत होता. ऐश्वर्या दार उघडत नव्हती. दार उघडले नाही तर आत्महत्या करेन असंही सलमान म्हणत होता.

सलमानच्या हातातून रक्त वाहू लागले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही संपूर्ण घटना पहाटे 3 वाजेपर्यंत चालली. सलमानने दरवाजा ठोठावत होता तेव्हा त्याच्या हातातून रक्त वाहत होते. दोन ते तीन तास चाललेल्या या नाट्यानंतर तीन वाजता ऐश्वर्याने दरवाजा उघडला आणि त्यानंतर सलमानला घरात घेतले. मीडियारिपोर्टनुसार दोघांच्या नात्यात कटुता येण्याचे मुख्य कारण म्हणजे लग्न. ऐश्वर्याने लग्नासाठी कमिटमेंट द्यावी अशी सलमानची इच्छा होती. मात्र ऐश्वर्या यासाठी तयार नव्हती.

जेव्हा सलमान ऍशला न सांगता अमेरिकेला गेला

दोघांचे जवळचे मित्र सांगतात की, ऍश तेव्हा लग्नासाठी तयार नव्हती आणि सलमानला हे आवडले नाही. जेव्हा सलमान त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीला मदत करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. त्यावेळी त्याने ऐश्वर्याला याबद्दल काहीही सांगितले नव्हते. ज्यामुळे ऍश त्याच्यावर रागवली.

जिथे प्रेम असते तिथे भांडण असते.

एका मुलाखतीत सलमान ऐश्वर्यासोबत ब्रेकअपनंतर म्हणाला होता, 'जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी सर्व काही करता. पण जेव्हा तुम्हाला त्या बदल्यात प्रेम मिळत नाही तेव्हा तुम्ही हिंसक बनता. प्रत्येक नात्यात भांडणे होतात. जर तुम्ही भांडत नसाल तर तुमच्यात प्रेम नाही. तुम्ही कधीही बाहेरच्या व्यक्तीशी भांडत नाही.

अखेर 2002 मध्ये ब्रेकअप झाले

सोमीला भेटल्यानंतर सलमान अमेरिकेहून परतल्यावर ऐश्वर्याला खूप राग आला होता. ज्यामुळे ती दरवाजा उघडत नव्हती. ज्यामुळे अखेर 2002 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. पण या ब्रेकअपच्या आदल्या रात्री नोव्हेंबरमध्ये सलमानच्या संतप्त प्रतिक्रियेना जगाला डेली सोपसारखा किस्सा दिला.

ब्रेकअप नंतर ऍशची मुलाखत

2002 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या रायने तिच्या पहिल्या मुलाखतीत सांगितले होते, 'तो मला कॉल करायचा आणि बकवास बोलायचा. माझ्या सहकलाकारांसोबत माझे अफेअर असल्याचा त्याला नेहमी संशय होता. त्याने मला अनेकवेळा मारहाण देखील केली आहे.

ऐश्वर्याने मुलाखतीत पुढे सांगितले की, 'तो मला मारहाण करायचा. पण सुदैवाने माझ्या चेहऱ्यावर आणि शरीरावर कोणतीही खूण नव्हती. जणू काही घडलेच नाही म्हणून मी कामावर जायचे. एवढे सगळे असूनही मी त्याला साथ दिली. वाईट काळात मी त्याच्या पाठीशी उभी राहिली.

'मी कोणालाही दुखवू शकत नाही'- सलमान

ऐश्वर्याच्या या मुलाखतीनंतर काही महिन्यांनी जेव्हा सलमानला या आरोपांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'जेव्हा मी खूप भावनिक होतो आणि जेव्हा मला राग येतो तेव्हा मी स्वतःला दुखावतो. मी भिंतीवरही डोकं आपटलं आहे, पण मी कुणालाही दुखवू शकत नाही.'' या संपूर्ण प्रकरणावर सलमानने काही बोलण्याची ही शेवटची वेळ होती. यानंतर प्रत्येक वेळी असे प्रश्न टाळण्याचे काम त्यांनी केले आहे.