भारताने गाठलं 100 कोटी लसीकरणाचा टप्पा, WHO ने पंतप्रधान मोदींचं केलं कौतूक

भारताला देशातील 100 कोटी कोरोना लसीकरणाच्या आकड्यांचा टप्पा गाठण्यासाठी 279 दिवस लागले.

Updated: Oct 21, 2021, 09:01 PM IST
भारताने गाठलं 100 कोटी लसीकरणाचा टप्पा, WHO ने पंतप्रधान मोदींचं केलं कौतूक title=

मुंबई : भारतात कोरोना लसीकरणाने 100 कोटींचा आकडा ओलांडल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख तेद्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

279 दिवसात 100 कोटी डोस

लक्षणीय म्हणजे, भारताला देशातील 100 कोटी कोरोना लसीकरणाच्या आकड्यांचा टप्पा गाठण्यासाठी 279 दिवस लागले. दरम्यान, डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी ट्विटमध्ये लिहिले, 'कोविड -19 पासून असुरक्षित लोकसंख्येचे संरक्षण करण्यासाठी आणि लसींच्या न्याय्य वितरणाचे ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि भारतातील लोकांचे अभिनंदन.'

लसीकरणाचे हे यश मिळवल्याबद्दल देशाचे अभिनंदन करताना, डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रीय संचालक डॉ. पूनम क्षेत्रपाल सिंह म्हणाल्या, "कोविड -19 लसींचे एक अब्ज डोस दिल्याबद्दल भारताचे अनेक अभिनंदन. इतक्या कमी कालावधीत हे असाधारण ध्येय साध्य करणे मजबूत नेतृत्व, आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कार्य आणि जनतेच्या समर्पित प्रयत्नांशिवाय शक्य नव्हते.

अधिकृत स्त्रोतांनुसार, भारतातील पात्र प्रौढ लोकसंख्येच्या 75 टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे आणि सुमारे 31 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले आहेत.