दिवाळीपर्यंत ९९ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे जियोचे लक्ष्य

मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जियो मार्केटमध्ये आल्यापासून टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 27, 2018, 10:44 PM IST
दिवाळीपर्यंत ९९ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे जियोचे लक्ष्य  title=

मुंबई : मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जियो मार्केटमध्ये आल्यापासून टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

पण आपली स्पर्धा यांच्याशी न ठेवता आपले लक्ष्य यापेक्षाही मोठं आहे हे जियोने सुरूवातीपासूनच दाखवून दिलेय.

ग्राहकांना फायदा 

दिवाळीपर्यंत ९९ टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत जियो पोहोचविण्याचे लक्ष जियोने जाहिर केलयं.  सॅमसंगला सोबत घेऊन इंटरनेट ऑफ थिंग्स सेवा होणार आहे. यामुळे ग्राहक आणि इंडस्ट्रींना फायदा मिळणार आहे.

१७० दिवसांत १० कोटी युजर्स

आता रिलायन्स जियो कंपनीकडे १६ कोटी ग्राहक आहेत. आम्ही गेल्यावर्षी १७० दिवसांत १० कोटी युजर्सना जोडल्याचे जियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष (टेक्नोलॉजी) तारीक अमीन यांनी सांगितले. 

निशुल्क युजर्सना शुल्क भरणाऱ्याच्या आमच्या क्षमतेवर संशय घेण्यात आला.  १६ महिने पूर्ण होण्याआधीच जियोकडे १६ कोटी युजर्स आहेत.  

जियो नेटवर्क टू जी ला मागे सोडणार आहे. आम्हाला प्रत्येक गावातील व्यक्तीला जियोशी जोडायचे आहे असे जियोतर्फे सांगण्यात येत आहे.