वैज्ञानिकांचं कौतूक

'मन की बात'मधून पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक

नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधून देशाशी संवाद साधला. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'वसंताचं आगमन झालं आहे. जेव्हा वातावरण छान असतं तेव्हा माणूस त्याचा आनंद घेतो. काही दिवसांपूर्वीच भारताने १०४ सॅटेलाईट लॉन्च केले. संपूर्ण जगाने भारताच्या वैज्ञानिकांचं कौतूक केलं. इस्रोने देशाचं नाव उंचावलं. या वर्षी देशात २७०० लाख टन धान्याचं उत्पादन झालं जे एक रेकॉर्ड आहे. असं वाटतं की, शेतकरी रोज पोंगल आणि वैशाखी साजरा करत आहे.'

Feb 26, 2017, 01:31 PM IST