Virat kohli ला होणार अटक? काय आहे नेमकं प्रकरण

टीम इंडियासोबत विराट कोहली देखील ऑस्ट्रेलियामध्ये आहे. 

Updated: Oct 15, 2022, 09:57 AM IST
Virat kohli ला होणार अटक? काय आहे नेमकं प्रकरण title=

मुंबई : सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये आहे. कारण उद्यापासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होतेय. टीम इंडियासोबत विराट कोहली देखील ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मात्र शनिवारी सकाळी ट्विटरवर झालेल्या ट्रेंडमुळे विराट कोहलीच्या चाहत्यांची झोपच उडाली आहे. विराट कोहलीला अटक करा, अशी मागणी ट्विटरवर केली जाते. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया...

दोन टीम्सच्या चाहत्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष झालाय हे यापूर्वी तुम्ही फुटबॉलसंदर्भात ऐकलं असेल. यावेळी काहींना जीवंही गमवावा लागलाय. असंच आता क्रिकेटच्या बाबतीतंही घडलंय. विराट कोहलीच्या एका चाहत्याने रोहित शर्माच्या फॅनला डोक्यावर बॅट घालून ठार केलं असल्याची घटना समोर आली. या हत्येमागचं कारण होतं ते म्हणजे, रोहित शर्माच्या चाहत्याने आरसीबीची खिल्ली उडवली होती.

भारतात क्रिकेट हा एक जणू धर्मच मानला जातो. क्रिकेटपटूंचे अनेक चाहते त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. अनेकदा चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूबद्दल वाईट ऐकू शकत नाही. असंच एक प्रकरण तमिळनाडूमध्ये घडलंय. तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात एका व्यक्तीला दारूच्या नशेत असताना त्याच्या मित्राची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि नंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय.

दरम्यान यानंतर आता सोशल मीडियावर रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत. यावेळी त्यांनी विराट कोहलीच्या चाहत्यांनी आता मर्यादा ओलांडली असून याला विराट कोहलीलाच जबाबदार धरलंय. त्यामुळे यासाठी विराट कोहलीला अटक केल्याची मागणी रोहितच्या चाहत्यांकडून केली जातेय?