लग्नामुळे क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं नाही - विराट कोहली

लग्न हा जीवनातील खास क्षण होता, मात्र त्यामुळे क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं असं नाही अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यानं दिलीय. 

Updated: Dec 27, 2017, 09:16 PM IST
लग्नामुळे क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं नाही - विराट कोहली title=

नवी दिल्ली : लग्न हा जीवनातील खास क्षण होता, मात्र त्यामुळे क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं असं नाही अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यानं दिलीय. 

टीम दौ-यासाठी पूर्णपणे सज्ज

भारतीय क्रिकेट टीमचा दक्षिण आफ्रिका दौरा येत्या पाच जानेवारीपासून सुरु होतोय. या दौ-याला रवाना होण्याआधी मुंबईत कोहली आणि कोच रवी शास्त्री यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी कोहली आणि शास्त्री यांनी टीम दौ-यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. 

किती सामने?

या दौ-यात टीम इंडिया तीन टेस्ट, सहा वनडे, आणि तीन टी-20 मॅचेस खेळणार आहे. या वर्षभरात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे बदललेले स्वरुप पाहायला मिळेल असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केलाय.