दुसऱ्या टी-२०साठी भारतीय टीम लखनऊमध्ये दाखल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० साठी भारतीय टीम लखनऊमध्ये पोहोचली आहे.

Updated: Nov 5, 2018, 08:50 PM IST
दुसऱ्या टी-२०साठी भारतीय टीम लखनऊमध्ये दाखल title=

लखनऊ : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० साठी भारतीय टीम लखनऊमध्ये पोहोचली आहे. मंगळवारी संध्याकाळी हा सामना रंगणार आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ५ विकेटनं विजय झाला होता. वेस्ट इंडिजनं ठेवलेल्या ११० रनचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनचा दम निघाला होता. या चुकीपासून शिकण्याची संधी भारतीय टीमला असल्याचं वक्तव्य भारताचा कर्णधार रोहित शर्मानं केलं होतं. ३ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-०नं आघाडीवर आहे. लखनऊमध्ये होणारी ही दुसरी टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.

तब्बल २४ वर्षानंतर लखनऊच्या केडी सिंह बाबू स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय मॅच खेळवण्यात येत आहे. याआधी १९९४ साली श्रीलंकेविरुद्ध या मैदानात भारताची टेस्ट मॅच झाली होती. यानंतर सगळ्या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलच्या मॅच कानपूरमध्ये खेळवण्यात आल्या. पुन्हा बांधणी करण्यात आलेल्या या मैदानात ५० हजार प्रेक्षक बसून मॅचचा आनंद घेऊ शकतात.