श्रीलंकेने टॉस जिंकला, भारताची प्रथम बॅटींग

भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ३ सामन्याच्या सिरीजमधील पहिला सामना आज धर्मशालामध्ये होत आहे. श्रीलंकेने टॉस जिंकत आधी बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 10, 2017, 11:18 AM IST
श्रीलंकेने टॉस जिंकला, भारताची प्रथम बॅटींग title=

धर्मशाला : भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ३ सामन्याच्या सिरीजमधील पहिला सामना आज धर्मशालामध्ये होत आहे. श्रीलंकेने टॉस जिंकत आधी बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

श्रेयस अय्यरचं डेब्यू

टेस्ट सीरीजमध्ये श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता वनडे सिरीज जिंकण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. कर्णधार विराट कोहली टीमचा भाग नाही आहे. तरी देखील टीम इंडिया श्रीलंकेच्या टीमवर भारी दिसते आहे. भारताने मागील वनडे सिरीजमध्ये श्रीलंकेला 5-0 ने हरवलं होतं. श्रेयस अय्यरचं वनडेमध्ये डेब्यू झालं आहे.

रोहित शर्मा कॅप्टन

रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. रोहित शर्माकडे पहिल्यांदा वनडे मॅचच्या कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. श्रेयस अय्यरचं वनडेमध्ये डेब्यू झालं आहे.