तिसऱ्या टी-20 आधी रैनाने केलं विराटबाबत असं वक्तव्य

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान शनिवारी तिसरी टी-20 रंगणार आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 24, 2018, 12:44 PM IST
तिसऱ्या टी-20 आधी रैनाने केलं विराटबाबत असं वक्तव्य title=

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान शनिवारी तिसरी टी-20 रंगणार आहे. 

रैनाची वापसी

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापसी करणारा भारतीय फलंदाज सुरेश रैना आता याचा फायदा घेत वर्ल्डकप 2019 मध्ये संघात जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याआधी वनडेमध्ये देखील तो जागा मिळवण्यासाठी रैना प्रयत्न करणार आहे.

विराट बाबत वक्तव्य

रैनाने म्हटलं की, या भारत दौऱ्याचा अंत विजयासोबत करायचा आहे. टीममध्ये याबाबत चर्चा झाली. जेव्हा तुम्ही प्रत्येक सामन्यात चांगली खेळी करतात तेव्हा तुम्ही त्याचा अंत देखील चांगला करण्याचा प्रयत्न असेल. रैनाने विराटबाबत देखील वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटलं की, विराट कोणतीही गोष्ट सहज घेत नाही. विराट कोणताही सामना हलक्यात घेत नाही. याशिवाय धोनी आणि रवी शास्त्री हे देखील खेळाडुंना सल्ला देत असतात.

रैनाने एक वर्षानंतर संघात वापसी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात पहिल्या सामन्यामध्ये त्य़ाने आक्रमक खेळी केली.