टीम इंडियाच्या कोचबाबत शिक्कामोर्तब?

सचिन, सौरव, लक्ष्मणने घेतला निर्णय

Updated: Jun 9, 2017, 02:24 PM IST
टीम इंडियाच्या कोचबाबत शिक्कामोर्तब? title=

मुंबई : सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्‍मण यांच्या नेतृत्‍वात असलेली बीसीसीआयच्या सल्लागार समितीने अनिल कुंबळेलाच कोच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे त्याच्या पदावर कायम राहिल अशी शक्यता आहे. 

लवकरच बीसीसीआयला याबाबत सूचना दिली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या प्रशासक समितीचा शिक्का मोर्तब झाल्यानंतर अनिल कुंबळे पुन्हा एकदा भारतीय संघाचा कोच म्हणून निवडला जाणार आहे.

चँपियंस ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने कोचच्या पदासाठी अर्ज मागवले होते. कारण कुंबळेचा कार्यकाळ या ट्रॉफीनंतर संपणार आहे. वीरेंद्र सेहवागसह ६ लोकांनी भारतीय संघाच्या कोचसाठी अर्ज केले होते. अनिल कुंबळेंनी देखील अर्ज केला होता.