IPL 2019: सुपर ओव्हरही टाय झाली तर असा लागतो मॅचचा निकाल

अत्यंत रोमांचक अशा मॅचमध्ये मुंबईने पंजाबचा पराभव केला. कायरन पोलार्ड हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Updated: Apr 11, 2019, 06:18 PM IST
IPL 2019: सुपर ओव्हरही टाय झाली तर असा लागतो मॅचचा निकाल title=

मुंबई : अत्यंत रोमांचक अशा मॅचमध्ये मुंबईने पंजाबचा पराभव केला. कायरन पोलार्ड हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ३१ बॉलमध्ये ८३ रनची वादळी खेळी केली. यामध्ये १० सिक्स आणि ३ फोरचा समावेश होता. पोलार्डने ही विस्फोटक खेळी केली असली, तरी मोक्याच्या क्षणी पोलार्ड आऊट झाला. अखेर अल्झारी जोसेफ आणि राहुल चहरने मुंबईचा विजय खेचून आणला. मुंबईला शेवटच्या बॉलवर २ रनची गरज असताना अल्झारी जोसेफनं २ रन काढून मुंबईला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

अल्झारी जोसेफला शेवटच्या बॉलवर दोनऐवजी एकच रन काढता आली असती, तर ही मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली असती.

काय आहेत सुपर ओव्हरचे नियम?

- मॅच संपल्यानंतर १० मिनिटांच्या आत सुपर ओव्हर सुरु झाली पाहिजे.

- सुपर ओव्हर एकच ओव्हरची असते.

- सुपर ओव्हर ही ज्या खेळपट्टीवर मॅच झाली त्याच खेळपट्टीवर झाली पाहिजे.

- मॅचमध्ये खेळलेले खेळाडूच सुपर ओव्हरमध्ये भाग घेऊ शकतात.

- मॅचमध्ये जी टीम दुसरी बॅटिंग करते, त्या टीमला सुपर ओव्हरमध्ये पहिली बॅटिंग मिळते.

- फिल्डिंग करणारा कर्णधार सुपर ओव्हरसाठीच्या बॉलची निवड करतो,

- सुपर ओव्हरमध्ये २ विकेट गेल्यानंतर टीमची बॅटिंग तिथेच संपते.

- सुपर ओव्हरमध्ये जी टीम सर्वाधिक रन करते त्यांना विजेता घोषित केलं जातं.

जर सुपर ओव्हर टाय झाली तर

- सुपर ओव्हर टाय झाली तर मॅच आणि सुपर ओव्हरमध्ये जी टीम सर्वाधिक बाऊंड्री (फोर आणि सिक्स) मारेल त्या टीमचा विजय होतो.

- जर दोन्ही टीमच्या बाऊंड्रीही सारख्याच असतील, तर ज्या टीमचा बॅट्समन मॅचमध्ये (सुपर ओव्हर सोडून) सर्वाधिक बाऊंड्री मारतो त्या टीमला विजेता घोषित केलं जातं.

- खेळाडूंच्या बाऊंड्रीही सारख्या असतील, तर सुपर ओव्हरमध्ये दोन्ही टीमनी सहाव्या बॉलपासून केलेला स्कोअर बघितला जातो. उदाहरणार्थ 

बॉल टीम-१च्या रन  टीम-२च्या रन
सहावा बॉल 
पाचवा बॉल
चौथा बॉल
तिसरा बॉल
दुसरा बॉल
पहिला बॉल
एकूण १५ १५

या टेबलवर नजर टाकली तर सुपर ओव्हरमध्ये दोन्ही टीमने १५ रनच केल्या आहेत. सहाव्या आणि पाचव्या बॉलवर दोन्ही टीमनी केलेला स्कोअरही सारखाच आहे. पण चौथ्या बॉलवर टीम-१ ने २ रन आणि टीम-२ ने एक रन केली आहे. त्यामुळे टीम-२ ला विजेता घोषित करण्यात येतं. नो किंवा वाईड बॉल सोडून जे बॉल अधिकृत आहेत तेच ग्राह्य धरले जातात. 

- यानंतरही दोन्ही टीमनी सगळ्या ६ बॉलवर सारख्याच रन केल्या, तर मॅच टायच राहते.