IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाचा 20 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडियाला कराव्या लागतील 'या' 4 गोष्टी

World Cup 2023 : भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये पाचवा सामना न्युझीलंड विरुद्ध धर्मशालेत खेळला जाणार आहे. दोन्ही संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तसेच भारताने आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात फक्त एकच विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 22, 2023, 08:36 AM IST
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाचा 20 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडियाला कराव्या लागतील 'या' 4 गोष्टी title=

India Vs New Zealand Cricket World Cup 2023: भारत आणि न्यूझीलंड, (India vs New Zealand) विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले दोन संघ रविवारी 22 ऑक्टोबर रोजी जगातील सर्वात सुंदर स्टेडियम, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, धर्मशाला येथे एकमेकांसमोर उभे ठाकतील. या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना पराभवाचा धक्का बसला आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे हा सामना खेळणार नाही. सूर्यकुमार यादव प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन करू शकतो. त्याचवेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला मैदानात उतरणे कठीण आहे. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम कर्णधार असेल. गेल्या 20 वर्षांपासून वर्ल्ड कप मॅचेसमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत जिंकलेला नाही. हा सामना जिंकून टीम इंडियाला केवळ विजयाचा दुष्काळ संपवायचा नाही तर २०१९ विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभवाचा बदलाही घ्यायचा आहे. 

अशावेळी भारतीय संघाला 4 महत्त्वाच्या गोष्टी करून विजय खेचून आणायचा आहे. त्या चार गोष्टी कोणत्या ते पाहूया. 

सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट न देणे

पॉवरप्ले ओव्हर्समध्ये टीम इंडियाला सावधपणे खेळावे लागेल. महत्त्वाच म्हणजे संघाला विकेट वाचवण्याकडे लक्ष द्यावे लागेल. जर भारताने सुरुवातीला विकेट गमावल्या तर त्यांच्यावर खूप दडपण असेल, ज्यामुळे मधली फळीही अडचणीत येईल. त्यामुळे सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये भारतीय टॉप ऑर्डरला जबाबदारीने खेळावे लागणार आहे.

पेसर्सला लक्षात ठेवणे

न्यूझीलंडकडे अप्रतिम वेगवान गोलंदाज आहेत, जे धरमशाला खेळपट्टीवर कहर करू शकतात. मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन हे त्रिकूट भारतीय फलंदाजांना खूप त्रास देऊ शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाला किवी संघाच्या वेगवान गोलंदाजांना सावधपणे खेळावे लागेल आणि त्यांच्या विकेट्स त्यांच्या हाती न देण्याचा प्रयत्न करावा लागेल. असे झाल्यास किवी संघ दडपणाखाली येईल.

उत्तम फिल्डिंग 

भारतीय क्रिकेट संघाच्या बांगलादेशविरुद्धच्या विजयासाठी चांगली क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरले. या विश्वचषकात भारतीय संघाने चांगले क्षेत्ररक्षण केले आहे, त्याचाही फायदा संघाला झाला आहे. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धही टीम इंडियाला चांगले क्षेत्ररक्षण करावे लागेल आणि किवी संघाला प्रत्येकी एका धावेचा फटका बसावा लागेल.

त्यांच्या ओपनर्सला लवकर आऊट करणे

न्यूझीलंड संघाचे सलामीवीर डिवॉन कॉन्वे आणि विल यंग सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारताला न्यूझीलंडचा डाव सुरुवातीपासूनच रोखायचा असेल, तर त्यांना किवी संघाच्या सलामीवीरांना लवकरात लवकर बाद करावे लागेल. तो टिकला तर तो भारताला अडचणीत आणू शकतो.