भारत- श्रीलंका कोलकाता कसोटीवर पावसाचा व्यत्यय

भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोलकाता टेस्टच्या दुस-या दिवशीही पावसानं व्यत्यय आणला. 

PTI | Updated: Nov 17, 2017, 07:25 PM IST
भारत- श्रीलंका कोलकाता कसोटीवर पावसाचा व्यत्यय title=

कोलकाता : भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोलकाता टेस्टच्या दुस-या दिवशीही पावसानं व्यत्यय आणला. 

पाऊस आणि अपुऱ्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ दोन तास आधीच थांबवण्यात आला. दुसऱ्या दिवसअखेर भारतानं ५  विकेट्स गमावत ७४  रन्स केल्या. पावसामुळे मॅच ३३ व्या ओव्हर्सनंतर थांबवण्यात आली. 

अजिंक्य रहाणे आणि आर. अश्विन प्रत्येकी ४ रन्सवर आऊट झाले. रहाणे आणि अश्विन या दोघांनाही दासून शानाकानं आऊट केलं. सध्या चेतेश्वर पुजारा ४७  तर वृद्धिमान साहा ६ रन्सवर नॉट आऊट आहेत.