Hardik Pandya ला का झाले अश्रू अनावर? अखेर खरं कारण आलं समोर!

सामन्यामध्ये हार्दिकने पहिल्याच चेंडूवर अप्रतिम कामगिरी करत तीन विकेट्स घेतले. त्यानंतर फलंदाजीमध्येही 40 रन्सचं योगदान दिलं.

Updated: Oct 24, 2022, 08:52 PM IST
Hardik Pandya ला का झाले अश्रू अनावर? अखेर खरं कारण आलं समोर! title=

मेलबर्न : T20 वर्ल्डकपमध्ये मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. यामुळे भारतीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. कालच्या सामन्यात पाकिस्तानने दिलेलं विजयासाठी 160 रन्सचं लक्ष्य टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. या विजयाचे शिल्पकार ठरले ते हार्दिक पंड्या आणि विराट कोहली. या सामन्यामध्ये हार्दिकने पहिल्याच चेंडूवर अप्रतिम कामगिरी करत तीन विकेट्स घेतले. त्यानंतर फलंदाजीमध्येही 40 रन्सचं योगदान दिलं.

टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने गेल्यावर्षीच्या वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा काढला.

अश्विनने मारलेल्या विजयी शॉटनंतर विराटचं कौतुक करण्यासाठी सर्व खेळाडू मैदानावर येत त्याच्या भवती जमले होते. यावेळी विराट कोहली भावूक झालेला दिसला. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या देखील डोळे पुसत असताना कॅमेरात कैद झाला. दरम्यान पंड्याचे डोळे का पाणावले होते याचं कारण त्याने स्वतः सांगितलं आहे.

हार्दिक पांड्या म्हणाला, "सामन्यापूर्वी राहुल सरांना सांगितलेलं की मी 10 महिन्यांपूर्वी कुठे होतो आणि आता कुठे आहे ही मोठी गोष्ट आहे. या गोष्टीसाठी मी खूप मेहनत घेतोय. ही खेळी माझ्या वडिलांची आहे. ते जर आता इथे असते तर खूप आनंद झाला असता."

पंड्या पुढे म्हणाला, "मला खेळण्याची संधी मिळाली नसती तर मी आता इथपर्यंत पोहोचलोच नसतो. माझ्या वडिलांनी त्यासाठी अनेक त्याग केलेत. त्यांनी आमच्यासाठी दुसऱ्या शहरात स्थायिक व्हायचं ठरवलंय. मी माझ्या वडिलांची सदैव ऋणी राहीन."