T20 World Cup : भारत बाहेर पडल्यावर 'पाकिस्तानी क्रिकेट' ने उडवली खिल्ली, 'या' खेळाडूकडून सडेतोड उत्तर

पाकिस्तानी वेबसाइटने उडवली खिल्ली   

Updated: Nov 9, 2021, 06:28 AM IST
T20 World Cup : भारत बाहेर पडल्यावर 'पाकिस्तानी क्रिकेट' ने उडवली खिल्ली, 'या' खेळाडूकडून सडेतोड उत्तर  title=

मुंबई : टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. भारत पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 10 गडी राखून हरला होता. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. भारताच्या पराभवावर पाकिस्तानी वेबसाइटने ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. ज्याला भारताचा माजी क्रिकेटर वसीम जाफरने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानी वेबसाइटने उडवली खिल्ली 

टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानच्या स्पोर्ट्स वेबसाइट 'पाकिस्तान क्रिकेट'ने ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. या वेबसाईटने टीम इंडियाच्या चाहत्यांना विचारले की, 'भारतीय चाहत्यांना कसे वाटते?' या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिले असले तरी माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने सडेतोड उत्तर दिले. 

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफरने खतरनाक उत्तर दिले आहे. पाकिस्तानी वेबसाइटच्या ट्विटचा हवाला देत त्यांनी लिहिले, '१२-१ च्या दरम्यान खूप जास्त जेवण केले, तरीही पोट भरल्यासारखे वाटत आहे.' जाफरने भारत आणि पाकिस्तानमधील चकमकींचा उल्लेख केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपमध्ये 13 सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 12 वेळा तर पाकिस्तानने 1 सामन्यात विजय मिळवला आहे.

सेमीफायनलमधून टीम इंडिया बाद

भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. भारताने आपल्या गटात केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्याला उपांत्य फेरी गाठता आली नाही. टी-२० विश्वचषक हा भारतीय संघासाठी स्वप्नवत ठरला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने गट 2 मध्ये 5 सामने जिंकून गौरवासह उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.