लग्नानंतर ही अफेअरमुळे वादात सापडले होते हे 5 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, करिअर झाला परिणाम

लग्नानंतर ही काही भारतीय क्रिकेटपटूंचे अफेअर होते. जे काही काळानंतर संपुष्टात आले. तर काहींनी नव्या नात्याला सुरुवात केली.

Updated: Feb 16, 2022, 05:25 PM IST
लग्नानंतर ही अफेअरमुळे वादात सापडले होते हे 5 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, करिअर झाला परिणाम title=

मुंबई : क्रिकेट जगतात अशा 5 दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंच्या अफेअरची चर्चा आहे, ज्यांची नावे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. लग्न होऊनही या 5 दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे अफेअर होते. काही क्रिकेटपटूंनी तर त्यांच्या अफेअरमुळे पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. काहींचे नाते नंतर तुटले.

1. सौरव गांगुली

सौरव गांगुली आणि बॉलिवूडची हसिना नगमा यांच्या नात्याची 2000 साली खूप चर्चा झाली होती. त्या काळातील सुंदर हसिना नगमाचे नाव सौरव गांगुलीशी जोडले गेले आणि त्यांच्या नात्याबद्दल विविध गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यावेळी असे मानले जात होते की नगमा आणि सौरव गांगुली यांचे अफेअर बरेच दिवस चालले होते. 2000 साली सौरव गांगुली त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यातून जात होता. यावेळी बॉलिवूडमध्ये नगमाची जादू शिगेला पोहोचली होती. सौरव गांगुली आणि नगमा यांच्यात एक नातं सुरू झालं, जे निश्चितच दीर्घकाळ टिकलं, पण दोघांनीही मीडियासमोर ही गोष्ट कधीच स्वीकारली नाही. 1997 मध्ये सौरव गांगुलीने त्याची बालपणीची मैत्रीण आणि जोडीदार डोनाशी कुटुंबाविरुद्ध जावून लग्न केले होते.

गांगुली-डोना जोडी आजही अनेकांसाठी आदर्श आहे. सुरुवातीच्या दिवसांत सर्व काही ठीक चालले होते, पण कथेत ट्विस्ट आला जेव्हा सौरव गांगुलीच्या आयुष्यात एका बॉलिवूड अभिनेत्रीने प्रवेश केला. नगमा असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे, जी केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जेव्हा डोनाला या गोष्टी कळल्या तेव्हा एक वेळ अशी आली की तिला सौरवपासून वेगळे व्हायचे होते म्हणजेच सौरवपासून घटस्फोट घ्यायचा होता. त्या नाजूक वेळी, डोनाने अतिशय संयमाने वागले आणि सौरवची बाजू सोडली नाही. डोनाने त्या सर्व बातम्यांना अफवा सांगून संपवले, परिणामी सौरव आणि नगमाचे ब्रेकअप झाले आणि डोनाने तिचे घर तुटण्यापासून वाचवले.

2. मोहम्मद शमी

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह ७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. काही वर्षांनंतर शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. हसीननेही शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोप केले होते. 2018 मध्ये मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने केलेला हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला होता. शमीविरुद्ध कलम ४९८ए (हुंडा छळ) आणि कलम ३५४ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर त्याचा भाऊ हसिद अहमद याच्यावर कलम ३५४ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मोहम्मद शमीने 6 जून 2014 रोजी कोलकाता स्थित मॉडेल हसीन जहाँशी लग्न केले होते. हसीन एक मॉडेल होती. त्यानंतर ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर बनली. यादरम्यान दोघांची भेट झाली आणि दोघांनीही एकमेकांना ह्रदय दिले. त्यानंतर शमीने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले. 17 जुलै 2015 रोजी शमी मुलीचा पिताही झाला.

3. मोहम्मद अझरुद्दीन

हैदराबादचा क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या दोन लग्नांबद्दल अनेकांना माहिती असेल. त्याने आधी नौरीनशी लग्न केले होते, तिच्यापासून त्याला दोन मुले होती, परंतु नंतर त्याचे बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिलजानीसोबत अफेअर होते. 1996 मध्ये, अभिनेत्री संगीता बिलजानीशी लग्न करण्याच्या प्रक्रियेत तो आपल्या पहिल्या पत्नीपासून वेगळे झाला. भारतीय संघाचा 90 च्या दशकातील कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची कारकीर्दही फिक्सिंगमध्ये नाव आल्याने संपुष्टात आली. मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्याने मोहम्मद अझरुद्दीन आपल्या कारकिर्दीत केवळ 99 कसोटी सामने खेळू शकला. 90 च्या दशकात मोहम्मद अझरुद्दीन हे सचिन तेंडुलकरपेक्षा मोठे नाव असायचे. तो देशाचा हिरो होता, पण फिक्सिंगमध्ये गुंतल्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती.

4. जवागल श्रीनाथ

भारताचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने यापूर्वी ज्योत्स्नासोबत लग्न केले होते, परंतु माधवी पत्रावली नावाच्या पत्रकाराशी लग्न करण्यासाठी तिला घटस्फोट दिला. दोघांनी 2008 मध्ये लग्न केले. पहिले लग्न असूनही जवागल श्रीनाथचे माधवी पत्रावलीसोबत अफेअर सुरू होते. 2003 च्या विश्वचषकात जवागल श्रीनाथने भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्या विश्वचषकात भारताच्या सलग 8 विजयात मोठे योगदान दिले होते. श्रीनाथने भारतीय संघासाठी 67 कसोटी सामने आणि 229 एकदिवसीय सामने खेळले. ज्यामध्ये श्रीनाथने कसोटीत 236 आणि एकदिवसीय सामन्यात 315 विकेट घेतल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जवागल श्रीनाथने मॅच रेफरी म्हणून दुसऱ्या डावाला सुरुवात केली. 2006 मध्ये कोलंबो येथे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात त्याने मॅच रेफरी म्हणून पदार्पण केले.

5. विनोद कांबळी

विनोद कांबळी 1998 मध्ये त्याची बालपणीची मैत्रिण नोएला लुईसशी लग्न केले, पण नंतर त्याचे मॉडेल अँड्रिया हेविटसोबत अफेअर होते. त्याने तिच्याशी लग्नही केले. 1993 ते 2000 या काळात भारतीय संघातून खेळलेला डावखुरा फलंदाज विनोद कांबळी आपल्या प्रतिभेच्या जोरावर महान खेळाडू बनू शकला असता, पण अनेक वादांमुळे तो विस्मृतीच्या अंधारात हरवून गेला.