Kalsarpa Dosh : वास्तू, कालसर्प दोष दूर करायचाय? घरातली लहानशी गोष्ट करेल असंख्य फायदे

कापूर सहसा धार्मिक कार्य, मंगल कार्य आणि पूजाअर्चेसाठी वापरला जातो. कापूर पेटवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणंही आहेत. असं म्हणतात की, कापराच्या धुरामुळं नकारात्मक उर्जा नाहीशी होऊन सकारात्मक उर्जे संचारते.

Updated: Jan 30, 2023, 08:20 PM IST
Kalsarpa Dosh : वास्तू, कालसर्प दोष दूर करायचाय? घरातली लहानशी गोष्ट करेल असंख्य फायदे  title=

Kalsarpa Dosh and Camphor Remedy : तुम्ही बऱ्याचदा म्हटलं असेल, कधीही कोणत्याही वास्तूमध्ये नकारात्मक बोलू नका, इच्छू नका. कारण, वास्तू कायम तथास्तू म्हणत असते. हिंदू धर्मात या साऱ्याला अनन्यसाधारण महत्त्वा आणि मान्यता आहे. प्रत्येक लहानसहान गोष्ट हिंदू धर्मात बरीच महत्त्वाची असल्याचं सांगण्यात येतं. इवलीशी कापराची वडीसुद्धा अतीव महत्त्वाची. 

कापूर सहसा धार्मिक कार्य, मंगल कार्य आणि पूजाअर्चेसाठी वापरला जातो. कापूर पेटवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणंही आहेत. असं म्हणतात की, कापराच्या धुरामुळं नकारात्मक उर्जा नाहीशी होऊन सकारात्मक उर्जे संचारते. कापराच्या धुरामुळं हवेत असणाऱ्या विषाणूंचा नायनाट होतो. मुख्य म्हणजे कालसर्प दोष दूर करण्यासाठीसुद्धा कापूर वापरला जातो. 

तुम्हाला शनि दोष आहे का? 

अंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीचं तेल मिसळून अशा पाण्याचा वापर केल्यास शनि दोष सहजपणे दूर करता येऊ शकतो. बेडरूममध्ये कापूर पेटवून त्याचा धूर केल्यास नकारात्मक शक्ती नष्ट होतात.

पुजेत कापूर का वापरतात?

कोणत्याही पूजा, हवन किंवा यज्ञ विधीमध्ये कापूर जाळण्याचे अनेक आध्यात्मिक फायदे आहेत. कापूर हे सकारात्मकता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर करते. काही हिंदू मान्यतेनुसार, देवतांना प्रसन्न करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. कापूर जाळणे हे सर्वशक्तिमानाशी एकतेचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की ज्याप्रमाणे कापूर जाळल्याने कोणतीही राख किंवा अवशेष राहत नाही, त्याचप्रमाणे पूजेच्या वेळी जाळल्याने व्यक्तीचा अहंकार पूर्णपणे नाहीसा होतो.

कापूर जाळण्याचे फायदे

कापूर आपल्या सभोवतालची हवा शुद्ध करण्यास मदत करते. ज्यामुळे पुढे आनंदी आणि निरोगी आयुष्य व्यतीत करता येते. कापूर जाळण्याचा मजबूत सुगंध बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यात मदत करतो ज्यामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण शुद्ध होते.

घरामध्ये रोज संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळला आणि त्याचा धूर घरभर पसरला तर घरातील सर्व दोष दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार कापूर जाळल्याने घरातील पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. कापूरचा धूर घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देत नाही आणि देवतांचा आशीर्वादही प्राप्त होतो.