IND vs WI : ईशानपासून शार्दूल ठाकूरपर्यंत...'हे' खेळाडू ठरले विजयाचे खरे शिल्पकार

IND vs WI :  टीम इंडियाने टेस्ट सिरीजनंतर आता वनडे सिरीजमध्येही वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. वनडे सिरीजमधील शेवटचा सामना निर्णयाक होता. आणि या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यामुळे भारताने सिरीजवर कब्जा केला. यावेळी टीम इंडियाच्या विजयात 5 खेळाडूंचा महत्त्वाचा वाटा होता. 

Aug 02, 2023, 12:38 PM IST
1/5

ईशान किशन

ईशान किशन

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन याने वेस्टइंडिजविरूद्ध तिन्ही सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली. शेवटच्या सामन्यात त्याने 64 बॉल्समध्ये 77 रन्सची खेळी केली.  

2/5

शुभमन गिल

शुभमन गिल

टीम इंडियाचा ओपनर फलंदाज शुभमन गिलसाठी पहिले 2 सामने काही खास ठरले नाहीत. यावेळी तिसऱ्या सामन्यात शुभमनने उत्तम फलंदाजी करत 85 रन्सची खेळी केली. 

3/5

संजू सॅमसन

 संजू सॅमसन

तिसऱ्या वनडे सामन्यात देखील संजूला संधी देण्यात आली होती. या सामन्यात त्याने संधीचं सोनं केलं. 41 बॉल्समध्ये संजूने 51 रन्सची खेळी केली

4/5

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात हार्दिक पंड्याला कर्णधारपद देण्यात आलं होतं. यावेळी तिसऱ्या सामन्यात उत्तम फलंदाजी करत हार्दिकने 52 बॉल्समध्ये 70 रन्स केले. 

5/5

शार्दूल ठाकूर

शार्दूल ठाकूर

शार्दूल ठाकूरसाठी वेस्ट इंडिजची वनडे सिरीज चांगली झाली. शेवटच्या वनडे सामन्यात शार्दूलने कमाल करत 4 विकेट्स घेतल्या.