IND vs ENG: टीम इंडियाच्या 'या' 5 खेळाडूंमुळे भंगलं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न

आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी फार वाईट दिवस आहे. टी-20 वर्ल्डकपमधून (T20 world cup) टीम इंडिया बाहेर पडली आहे. एडिलेडमध्ये झालेल्या इंग्लंड विरूद्ध भारत (INDvsENG) या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने (England) 10 विकेट्सने भारताचा पराभव केला. दरम्यान या 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलंय

Nov 10, 2022, 22:32 PM IST
1/5

केएल राहुल

टी20 वर्ल्डकप 2022 च्या या मोठ्या सामन्यात ओपनर केएल राहुल पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध 5 रन्स केल्यानंतर विकेट गमावली. टीमला चांगली सुरुवात करण्यात तो पुन्हा एकदा अपयशी ठरला.

2/5

भुवनेश्वर कुमार

टीम इंडियाच्या या पराभवाचा भुवनेश्वर कुमार दुसरा खलनायक ठरला. या सामन्यात त्याने 2 ओव्हरमध्ये 25 रन्स दिले आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

3/5

अर्शदीप सिंह

T20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप सिंग या सामन्यात एकही विकेट काढू शकला नाही. अर्शदीप सिंगने 2 ओव्हरमध्ये 15 रन्स दिले. मात्र विकेट घेण्यात अपयशी ठरला.

4/5

मोहम्मद शमी

अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीलाही इंग्लंडविरुद्ध विकेट घेता आली नाही. मोहम्मद शमीने 13.00 च्या इकॉनॉमीमध्ये 3 ओव्हरमध्ये 39 रन्स दिले. या सामन्यात मोहम्मद शमी दुसरा सर्वात महागडा गोलंदाज ठरलाय.

5/5

रविचंद्रन अश्विन

टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही एकही विकेट घेता आली नाही. रविचंद्रन अश्विन हा मधल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. या सामन्यात अश्विनने 2 ओव्हरमध्ये 27 रन्स दिल्या.