हॅपी कपल्स दररोज हे काम करतात!

कधी आपण हा विचार केलाय की, ज्या जोडप्याला आपण आदर्श मानता, त्यांनी लग्नानंतर असं काय केलं की, ते इतके आनंदी असतात. 

Updated: Jul 12, 2015, 04:40 PM IST
हॅपी कपल्स दररोज हे काम करतात! title=

मुंबई: कधी आपण हा विचार केलाय की, ज्या जोडप्याला आपण आदर्श मानता, त्यांनी लग्नानंतर असं काय केलं की, ते इतके आनंदी असतात. 

एकदा लग्न झालं की वादविवाद आणि रुसवे फुगवे सुरू होतात. पण हे बंधन अतूट आणि आनंदी ठेवायचं असेल तर काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

जाणून घ्या सुखी जीवनासाठी काही टीप्स -

१. नेहमी आपल्या जोडीदारासोबत गप्पा मारल्यानं आपल्यातील संबंध अधिक मजबूत होतात. यामुळं गैरसमज निर्माण होत नाहीत.

२. आपणा दोघांमध्ये अशा काही सवयी नक्की असतील ज्या सारख्या असतील. त्या एकत्रपणे एंजॉय केल्यानं प्रेम वाढतं.

३. एकमेकांसोबत जितका जास्त वेळ घालवाल तितकं एकमेकांना समजून घेऊ शकाल. यामुळं दोघांमधील नातं अधिक घट्ट होतं.

४. कोणत्या घटनेमुळं किंवा बोलण्यामुळं आनंदानं आलिंगण देणं किंवा इतर पद्धतीनं आपलं प्रेम व्यक्त केल्यानं वैवाहिक आयुष्य अधिक सुदृढ आणि आनंदी राहतं.

५. एकमेकांचा लाड केल्यानंही प्रेम वाढतं. एखादवेळेस एकमेकांची छेड काढणं किंवा लहानमुलासारखं वागणं चांगलं ठरू शकतं.

६. अनेकदा असं होतं आपण प्रेमाची कबुली देत नाही, समोरच्याला तर सगळंच माहितीय मग का सांगायचं, असं वाटतं. पण दिवसातून दोनवेळा तरी आपण आपल्या प्रेमाची कबुली दिली तर ते तुमच्यासाठी चांगलंच ठरेल.

७. जर सार्वजनिक ठिकाणी आपल्याला प्रेम दाखविण्याची संधी मिळाली, तर ती सोडू नका. असं केल्यानं आपल्या पार्टनरचा आपल्यावरील विश्वास वाढतो.

८. एकत्र बसलेले असतांना, झोपण्यापूर्वी भविष्यासंदर्भात स्वप्न पाहणं आणि आपल्या कुटुंबाबद्दल प्लानिंग केल्यानंही प्रेम वाढतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.