२०२० पर्यंत निर्माण होणार ३ लाख नोकऱ्या

नव्या कंपन्या पुढील काही वर्षात तीन लाख नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देणरा आहे. तसेच रोजगाराच्या शोधासाठी असलेल्या ८० टक्के व्यक्ती अशा उद्योगांकडे आकर्षीत होत आहे त्यात गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे. 

Updated: Feb 23, 2015, 11:31 AM IST
२०२० पर्यंत निर्माण होणार ३ लाख नोकऱ्या title=

मुंबई : नव्या कंपन्या पुढील काही वर्षात तीन लाख नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देणरा आहे. तसेच रोजगाराच्या शोधासाठी असलेल्या ८० टक्के व्यक्ती अशा उद्योगांकडे आकर्षीत होत आहे त्यात गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे. 

मनुष्यबळ विकास तज्ज्ञांनुनसार नव्या कंपन्यांनी गेल्या वर्षात ५०-६० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच भविष्यात प्रत्येक क्षेत्रातील नव्या कंपन्या नव्या नियुक्तींबाबत सकारात्मक दृष्टीकोन आहे. 

तसेच ज्या व्यक्ती रोजगाराचा शोध करीत आहेत. त्यातील ८० टक्के लोक हे नव्या कंपन्यांकडे आकर्षित होत आहे. ते प्रस्थापित कंपन्यांकडे पाठ फिरवत आहेत. मेरीटट्रॅक कंपनीनुसार भारतात २०२० पर्यंत २.५ ते ३ लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती होऊ शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.