ठाणे अपघातात पाच ठार

ठाणे खारीगांव टोल नाका येथे आज पहाटे झालेल्या ट्रक - कार भीषण अपघात पाच जण ठार झालेत. ठार झालेले अंबरनाथ येथील असल्याचे समजते. मात्र, मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2013, 02:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे खारीगांव टोल नाका येथे आज पहाटे झालेल्या ट्रक - कार भीषण अपघात पाच जण ठार झालेत. ठार झालेले अंबरनाथ येथील असल्याचे समजते. मात्र, मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.
हा अपघात एवढा भीषण होता की, दोन मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेतच बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अन्य तिनही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, या अपघाताचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. कारमधील सर्व प्रवासी हे अंबरनाथचे असल्याचे समजते. अद्याप अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.