यामुळे झालं विराट-अनुष्काचं ब्रेकअप ?

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

Updated: Feb 1, 2016, 11:55 PM IST
यामुळे झालं विराट-अनुष्काचं ब्रेकअप ? title=

मुंबई: क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. रणबीर-कतरिना वेगळे झाल्यानंतर विराट आणि अनुष्काचंही ब्रेकअप होईल असं बोललं जात होतं. त्यातच आता विराट-अनुष्काचं ब्रेकअप का झालं, याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

विराट कोहलीनं अनुष्काला लग्न करण्याची मागणी घातली. पण विराटचं ही मागणी अनुष्कानं फेटाळली. विराट कोहलीला याच वर्षी अनुष्काबरोबर लग्न करायचं होतं, पण अनुष्काच्या मनात मात्र वेगळाच विचार होता, असं बोललं जात आहे.

 

अनुष्का शर्माला या वर्षी फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रीत करायचं आहे, त्यामुळे 2017 पर्यंत तरी तिचा लग्नाचा विचार नाही, या वरुनच दोघांमध्ये वाद झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  या वादांमुळेच विराटनं अनुष्काला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे खरचं या दोघांचं ब्रेकअप झालं आहे का पुन्हा एकदा दोघं एकत्र येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.