'माझ्या मूर्खपणामुळे मॅच हारलो'

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवाची खंत अजूनही बांग्लादेशचा खेळाडू महमदुल्लाला आहे.

Updated: Apr 13, 2016, 06:55 PM IST
'माझ्या मूर्खपणामुळे मॅच हारलो' title=

ढाका: टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवाची खंत अजूनही बांग्लादेशचा खेळाडू महमदुल्लाला आहे. माझ्या चुकीच्या शॉटमुळे त्या मॅचमध्ये बांग्लादेशचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे. 

भारतानं दिलेल्या 147 रनचा पाठलाग करताना बांग्लादेश विजयाजवळ पोहोचली होती. पण शेवटच्या तीन बॉलमध्ये तीन विकेट गेल्यानं बांग्लादेशचा पराभव झाला. 

2 बॉलमध्ये 2 रन पाहिजे असताना महमदुल्लाला बॅटिंग करत होता. महमदुल्लालाच बांग्लादेशला मॅच जिंकवून देईल, असा विश्वास वाटत होता, पण सिक्स मारण्याच्या नादात तो आऊट झाला.

मी मैदानात होतो तोपर्यंत आम्ही जिंकू असा विश्वास वाटत होता, पण माझ्या मूर्खपणामुळे तो सामना आम्ही गमावला अशी कबुली महमदुल्लालानं दिली आहे.