भारत विजयाची दिवाऴी साजरी करणार का?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज अखेरचा आणि निर्णायक सामना रंगणार आहे. अखेरच्या निर्णायक सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Updated: Oct 29, 2016, 07:51 AM IST
भारत विजयाची दिवाऴी साजरी करणार का? title=

विशाखापट्टणम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज अखेरचा आणि निर्णायक सामना रंगणार आहे. अखेरच्या निर्णायक सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आणि न्यूझीलंडने प्रत्येकी दोन दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे अखेरचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्यास दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. 

1988नंतर आतापर्यंत न्यूझीलंडला भारतात एकही मालिका जिंकता आलेली नाहीये. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघ प्रयत्नशील असेल हे नक्की. 

सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजता.