सत्तेत असून विरोध का करतात उद्धव ठाकरे जाणून घ्या कारण

  केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून शिवसेना सरकारवर टीका का करते याचे खरं कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 4, 2017, 07:15 PM IST
सत्तेत असून विरोध का करतात उद्धव ठाकरे जाणून घ्या कारण title=

  मुंबई :   केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून शिवसेना सरकारवर टीका का करते याचे खरं कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. 

मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.
  
शिवसेना विरोध करते असा मथळे आणि बातम्या छापून येतात. लोकांना वाटतं की आम्ही विरोध करतो. पण आमचा विरोध हा लोकांसाठी असतो. त्यांच्या भल्यासाठी असतो. 

मुंबई -नागपूर एक्स्प्रेस हायवेला विरोध, मेट्रोला विरोध असे तुम्ही वाचतात. पण विरोध करताना आम्ही लोकांचे हित लक्षात घेतो. मेट्रोच्या उभारणीत गिरगावकरांची घरे जाणार होती. त्यामुळे आम्ही विरोध केला. त्यावेळी माझ्या समोर हा विषय आला. मी त्यांना सांगितलं की मेट्रोमध्ये कोणाची घरे जाणार आहे त्याचा नकाशा आहे. तर ज्यांची घरे जाणार आहेत. त्यांना नवीन घरे त्याच ठिकाणी कुठे मिळणार आहेत. याचाही नकाशा तयार करा, तसा नकाशा तयार केला. आम्ही मेट्रोला विरोध केला नाही. त्यामुळे विरोधाला विरोध नसतो हे पुन्हा एकदा सांगतो.   

 

उद्धव ठाकरें यांचे रंगशारदातील भाषणतील ठळक मुद्दे 

  
  - नवीन वर्षाच्या पाहिल्याच आठवड्यात मला जिवंत महाराष्ट्राचं दर्शन घडलेलं आहे. 
- मला बोलू न देणारा अजून जन्माला यायचाय
- सुरुवातीला संघटनेचं काम सुरु केलं तेव्हा माझ्यावर घराणेशाहीचा आरोप झाले. घराण्याचे गन किती माहीत नाही पण अवगुण आलेत. जे पटत नाही त्याविरोधात बोलणारच
- लाल दिवा किती काळ टिकणार. जनतेशी नीट वागलात तर ते जे प्रेम देतील ते लाल दिव्यात मिळणार नाही 
- नोटाबंदीला जनतेचा पाठींबा 
- अच्छे दिनाची आशा फक्त उरलीये. आजकाल जिवंत आहोत हेच अच्छे दिन
- जुमल्यावर यांनी यांचे इमले बांधले
- घोषणांची भूल लोकांना दिली जातेय. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. 
- हिंदू धर्माच्या आधारावर आम्ही मतं मागितली नाहीत व हिंदुत्वाचं रक्षण आम्ही करणारच. मग तो गुन्हा असला तरी करणारच
- राष्ट्रपतींना विनंती कि निवडणुकींआधी अर्थसंकल्प मांडता कामा नये. हा चुकीचा पायंडा पाडला जातोय.
- पंतप्रधान एका ठराविक पक्षाच्या किंवा एका उमेदवाराच्या प्रचाराला जाता काम नये. पंतप्रधान हा सर्वांचा असतो एका पक्षाचा नाही
- मल्ल्या पळाला, मोदी पळाला म्हणजे ललित मोदी...लाईनीत उभे कोण ? 
- रवी शंकरांना प्रसूती वेदना कशा कळल्या हा प्रश्न मनात आला. 
- जिल्हा बँकेवरची बंदी अजूनही उठवलेली नाही. नाबार्ड दरवर्षी जाहीर न करता 21 हजार कोटी देतं या वर्षी जाहीर करण्यात आलं. ते ही अजून मिळालेले नाहीत.
- शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नसतो मग त्याचा पैसा तुम्ही का रोखता? 
- जिल्हा बँकेत भ्रष्टाचार होईल म्हणून टाळं लावलं जात, तरीही लाखो कोटींच्या नोटा बाहेर आल्या त्या कुठून आल्या याची चौकशी कोण करणार?
- नीती आयोगाचे पानडीया म्हणतात महिलांच्या बचतीवर लक्ष ठेवावे लागेल. म्हणजे आता आपले साखर, मीठ, पिठाचे डबे सरकार उघडून बघणार. जो येईल त्याला आधी मसाल्याचा डबा उघडून द्या आणि डोकं घालून बघ म्हणाव किती पैसे आहेत.
- उठता बसता टीका करायला आम्हला वेड लागलेलं नाही.
- पुणे मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाला आणि हरित लवादाने स्टे दिला. सवंग लोकप्रियतेसाठी पंतप्रधानांचा अपमान कशाला?
- फेब्रुवारीत अर्थसंकल्प का मांडला जातोय? 
- तो पाच राज्यांच्या निवडणुकांच्या नंतर मांडला जावा
- राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला फेब्रुवारीत अर्थसंकल्प मांडण्यापासून रोखावे. 
- मी मतदारसंघात फिरणार पण माझ्या हातात काही नाही. दुसरीकडे नाताळबाबा (नाव न घेता नरेंद्र मोदी) आपली झोळी घेऊन आश्वासनांची खैरात करतोय.
- खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घ्यावी. केंद्र सरकारला अर्थसंकल्प मांडू देऊ नका असे शिवसेना खासदारांनी राष्ट्रपतींना सांगावे
- पंतप्रधान आवास ('आभास' शब्द उच्चारला आधी) योजनेचे फॉर्म भरून घेतले अजून योजना सुरु नाही.
- आमच्याकडे मतदारांना वाटायला लक्ष्मी नाही. बाकी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मी दर्शनाबाबत बोलायचे ते बोलले आहेत.
- युती कोणत्याही परिस्थितीत लाचारी पत्करून करणार नाही
- जिंकणं जर का महत्वाचा असेल तर जिंकणार.
- स्थानिक आघाडीत माझे शिवसैनिक पण स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेतील.पण धनुष्य बाण सोडायचा नाही
- आमच्या अस्तित्वाशी लढायची जर तयारी असेल तर दोन हात करायला मैदानात उतरा, कपट कारस्थान आम्हाला जमत नाही, आमची ती औलाद नाही
- पंतप्रधानांना विनंती, बेकार झालेल्यांना तुमच्या माध्यमातून नोकरी द्या, नुकसान भरपाई द्या.
- धाडी टाकताना आमच्या पुरोहितांवर ऑन धाडी टाकता. मंदिर वही बनाएंगे आणि धाडी उसीपर डालेंगे.
- काला त्र्यंबकचे उरोहित आले होते. त्यांना सांगितले कर्म कांडाला समर्थन नाही पण हिंदू म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहणार. त्यांनी माल्ल्यासारखं दारु विकून पैसा कमवला नाही.