राज्यातही टोलमाफीला आणखी मुदत वाढ

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. राज्यात 3 दिवस टोलमाफी असणार आहे.

Updated: Nov 11, 2016, 07:11 PM IST
राज्यातही टोलमाफीला आणखी मुदत वाढ  title=

मुंबई : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. राज्यात 3 दिवस टोलमाफी असणार आहे.

देशामधील राष्ट्रीय महामार्गांवर आता १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी असणार आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर टोलनाक्यांवर कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी यापूर्वी शुक्रवारी, ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली होती. आता यात आणखी तीन दिवस वाढ करण्यात आलेय, तशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

महामार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी ही टोलमाफीची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला, अशी माहिती अर्थमंत्री सुधीन मुनगंटीवर यांनी माहिती दिली आहे. वाहनधारक आणि चालकांना मोठा दिलासा दिला आहे.