मुंबई विद्यापीठाला पडला 'बौद्ध' धर्माचा विसर

मुंबई विद्यापीठाला बौद्ध धर्माचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न पडण्याची वेळ आलीय.

Updated: Jun 16, 2016, 03:56 PM IST
मुंबई विद्यापीठाला पडला 'बौद्ध' धर्माचा विसर title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाला बौद्ध धर्माचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न पडण्याची वेळ आलीय.

सध्या सुरू असलेल्या डिग्री प्रवेशाच्या ऑनलाईन अर्जावर बौद्ध धर्माचा उल्लेखच नसल्याचं पुढे आलंय. 

'रिलिजन' अर्थात 'धर्म' निवडण्याच्या पर्यायामध्ये, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन आणि इतर हा पर्याय आहे. त्यामुळे बौद्ध धर्मीय विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालाय.

विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव 'इतर' या पर्यायावर क्लिक करावं लागतंय.