मराठा मोर्च्यात राजकीय मंडळी फूट पाडू पाहताहेत

मराठा मोर्च्याच्या धाकाने काही राजकीय मंडळी समाजात फुट पाडू पाहत आहे असा आरोप मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीने केलाय. 

Updated: Dec 1, 2016, 10:54 PM IST
मराठा मोर्च्यात राजकीय मंडळी फूट पाडू पाहताहेत  title=

औरंगाबाद : मराठा मोर्च्याच्या धाकाने काही राजकीय मंडळी समाजात फुट पाडू पाहत आहे असा आरोप मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीने केलाय. 

मराठा समाजात फुट पाडू पाहणाऱ्यांना धडा शिकवू असा इशारा देखील संयोजन समितीने औरंगाबादेत दिला. हिवाळी अधिवेशनावर मराठा समाज क्रांती मोर्चा काढणार असून आम्ही आमच संयम सोडणार नाही. 

आता पर्यंत ज्या मार्गाने मोर्चा निघाला तसाच मोर्चा निघेल, सोशल मीडियावर फिरत असलेल्या चर्चा चुकीच्या असून मोर्च्याची दिशा बदलन्याच काम काही जन करत आहे पण तस काही होणार नाही याची ग्वाही संयोजन समितीने दिली आहे. 

मार्च पर्यंत समाजाच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर दिल्लीमध्ये दोन लाख मराठे आंदोलनाला बसतील असा इशारा यावेळी देण्यात आला. 

संभाजी ब्रिगेडने आपला पक्ष जरी स्थापन केला असला तरी त्यांची ध्येय धोरण जाहीर होई पर्यंत त्यांना पाठींबा नसल्याच मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीने सांगितलं.