अखेर देश सोडण्यावर बोलला आमिर

असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यावर आमिर खाननं स्पष्टीकरण दिलं आहे.

Updated: Jan 25, 2016, 10:30 PM IST
अखेर देश सोडण्यावर बोलला आमिर title=

मुंबई: असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यावर आमिर खाननं स्पष्टीकरण दिलं आहे. काही जण माझ्यावर रागावले, पण त्यांना माझं वक्तव्य नीट समजलं नाही अशी प्रतिक्रिया आमिरनं दिली आहे. तसंच मी देश सोडून जाणार नाही, असंही आमिर म्हणाला आहे. मी 3 आठवड्यांपेक्षा जास्त देशाबाहेर राहुच शकत नाही, बाहेर असलो की देशाची आठवण येते असं वक्तव्य त्यानं केलं आहे.
काही लोकांना वाटतं मी देश सोडून जाणार आहे, पण मी त्यांना सांगू इच्छितो की माझा जन्म या देशात झाला आहे, आणि मी या देशातच मरणार, अशा शब्दांमध्ये आमिरनं खडसावलं आहे. 
रंग दे बसंती या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे चित्रपटाच्या टीमसाठी एक खास स्क्रीनिंगचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आमिरनं असहिष्णुता आणि देश सोडून जाण्याच्या वादावर ही प्रतिक्रिया दिली.