लाचलुचपत प्रतिबंधक विभाग RTIच्या कक्षेतच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचा आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी रद्द केला. राज्यपालांच्या या निर्णयामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. 

Updated: Oct 30, 2014, 09:58 PM IST
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग RTIच्या कक्षेतच title=

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचा आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी रद्द केला. राज्यपालांच्या या निर्णयामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. 

आघाडी सरकारनं सत्तेवरुन पायउतार होताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात घाईघाईनं अधिसूचनाही काढण्यात आली होती. आघाडी सरकारच्या या निर्णयावर राज्यभरातून टीका झाली होती. माहिती अधिकार कायद्याच्या कलम २४ (४) चा दाखला देत सरकारनं हा निर्णय घेतला असला तरी हा कलम गुप्त वार्ता आणि संरक्षण संघटना यांनाच लागू होतो, असं माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. 

अखेरीस राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी हा अध्यादेश रद्द करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार दणका दिला. राज्यपालांनी आघाडी सरकारनं काढलेला अध्यादेश रद्द केल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग माहिती अधिकाराच्या कक्षेत आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.