'100 दिवसात 100 रूपयेही परत आणले नाहीत'

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. काळा पैसा भारतात आणणार, अशा वल्गना करणाऱ्या सध्याच्या केंद्र सरकारने 100 दिवसात 100 रूपयेही परत आणले नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. 

Updated: Sep 7, 2014, 06:13 PM IST
'100 दिवसात 100 रूपयेही परत आणले नाहीत' title=

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. काळा पैसा भारतात आणणार, अशा वल्गना करणाऱ्या सध्याच्या केंद्र सरकारने 100 दिवसात 100 रूपयेही परत आणले नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. 

तसेच नियोजन आयोग बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतला, हा देशाच्या विकासासाठी घातक ठरणार असल्याचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस कमिटीच्यावतीनं आज ‘जिंकणारच’ या प्रचार पुस्तिकेचं महाराष्ट्र प्रकाशन करण्यात आलं. काँग्रेस सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा या पुस्तिकेत मांडण्यात आला आहे. 

प्रचार प्रमुख नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि समन्वय समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते.

जिंकणारच या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान नक्की कोणते मुद्दे जनतेसमोर मांडायचे, याचे मार्गदर्शन करण्यात आलं आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामावर टीका करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.