मुंबईत कारने ८ जणांना उडवले, १ ठार

मुंबईत चारकोप भागात भरधाव कारने आठ जणांना उडवलं आहे, यात एकाचा मृत्यू झाला आहे. काका केणी बस थांब्यावर उभ्या असलेल्या ८ प्रवाशांना उडवल्याची घटना ही बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

Updated: Feb 13, 2014, 08:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत चारकोप भागात भरधाव कारने आठ जणांना उडवलं आहे, यात एकाचा मृत्यू झाला आहे.
काका केणी बस थांब्यावर उभ्या असलेल्या ८ प्रवाशांना उडवल्याची घटना ही बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात शिवलाल मेघजी यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ७ जणांपैकी सहा जखमींना स्थानिक रूग्णालयात नेण्यात आलं.
कारचालक श्रीकांत तिवारी हा पत्रकार आहे. तो भरधाव वेगाने चारकोप येथील सह्याद्री नगराच्या दिशेने जात होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.