फडवणीस सरकारला १०० दिवस, टोल मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचा युटर्न

राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झालेत. मात्र शंभर दिवस होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलच्या मुद्यावरुन युटर्न घेतला आहे.

Updated: Feb 7, 2015, 05:21 PM IST
फडवणीस सरकारला १०० दिवस, टोल मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचा युटर्न title=

मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झालेत. मात्र शंभर दिवस होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलच्या मुद्यावरुन युटर्न घेतला आहे.

टोलमुक्त महाराष्ट्र ही आमची संकल्पना आहे. मात्र टोलमुक्त महाराष्ट्र करू असं घोषणापत्रात कुठेही म्हटल नव्हतं, अशी पलटी मुख्यमंत्र्यांनी मारली. जाचक टोल बंद करण्याचा प्रयत्न करु असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांतल्या कामांचा पाढा वाचला. तसंच मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवरही टीका केली आहे. आघाडी सरकारमुळे राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आणि राज्याची पीछेहाट झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.