बँकेतून पैसे न मिळाल्याने महिला शेतकऱ्याची आत्महत्या?

एका महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 5, 2017, 06:41 PM IST
बँकेतून पैसे न मिळाल्याने महिला शेतकऱ्याची आत्महत्या? title=

नंदुरबार : एका महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवला आहे. 

मका विकून हे पैसे या महिलेने बँक ऑफ बडोदा बँकेत टाकले असल्याचं सांगण्यात येत आहे. या बँकेतून या महिलेला 10 हजार रुपये मिळाले. 

जनधनमधून महिन्याला अकाऊंटमधून 10 हजारच निघतील, असे बँक अधिकाऱ्याने स्पष्ट केल्यानंतर, नैराश्यातून या महिला शेतकऱ्यानं आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. याच तणावातून महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईक आणि कुटुंबीयांनी केला आहे.