दुष्काळाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आमदारांमध्येच जुंपली

 दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्याच सदस्यांमध्ये काही काळ जुंपल्याचं चित्र आज विधान परिषदेत पहायला मिळालं... 

Updated: Dec 15, 2015, 03:58 PM IST
 दुष्काळाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आमदारांमध्येच जुंपली  title=

नागपूर :  दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्याच सदस्यांमध्ये काही काळ जुंपल्याचं चित्र आज विधान परिषदेत पहायला मिळालं... 

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या आमदारांमध्ये दुष्काळ कुणाचा यावरून तू तू मै मै झाली... दुष्काळावर चर्चा सुरू असताना शेकापचे जयंत पाटील बोलत होते. त्यावेळी समान पाणीवाटपबाबत बोलताना मराठवाडयात पेरणीच झाली नसेल तर पाणी कशाला हवं, असा सवाल त्यांनी केला... 

हा मुद्दा राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांनी उचलून धरला आणि नाशिकमध्ये पण दुष्काळ असल्याचं म्हटलं... त्यावर बीडचे अमरसिंह पंडित यांनी आक्षेप घेतला. यामुळे राष्ट्रवादीच्या मराठावाडा आणि नाशिकमधल्या आमदारांमध्ये काही काळ जुंपल्याचं बघायला मिळालं.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.