रत्नागिरीत चक्क तिळ्यांचा जन्म

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील एका महिलेने चक्क तिळ्याला जन्म दिलाय. बाळांची आणि आईची प्रकृत्ती उत्तम आहे.

Updated: Mar 19, 2016, 10:14 PM IST
रत्नागिरीत चक्क तिळ्यांचा जन्म title=

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील एका महिलेने चक्क तिळ्याला जन्म दिलाय. बाळांची आणि आईची प्रकृत्ती उत्तम आहे.

जाधववाडी येथील सौ. समीक्षा संदेश पवार या महिलेने संगमेश्वरलामधील डॉक्टर खातू यांच्या रुग्णालयात तीन बालकांना जन्म दिला. या बालकांमध्ये दोन मुलगे आणि मुलगी आहे.

या महिलेला प्रसूतीवेदना झाल्याने खातू यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. सुनेत्रा प्रसाद खातू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिझर यशस्वी केले. बाळासह आईची प्रकृती चांगली असून तिन्ही बालकांचे वजन प्रत्येकी १.५ किलो आहे.