भयंकर... तीन वेगवेगळ्या अपघातांत ११ जणांनी गमावला जीव

अपघातांचं वाढतं प्रमाण चटकन आपल्या डोळ्यांत शिरेल अशा तीन अपघातांच्या घटना अवघ्या काही तासांच्या अवधीत घडल्यात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. 

Updated: Mar 11, 2015, 10:23 AM IST
भयंकर... तीन वेगवेगळ्या अपघातांत ११ जणांनी गमावला जीव title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : अपघातांचं वाढतं प्रमाण चटकन आपल्या डोळ्यांत शिरेल अशा तीन अपघातांच्या घटना अवघ्या काही तासांच्या अवधीत घडल्यात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. 

नाशिक पुणे महामार्गावर अपघात
नाशिक - पुणे महामार्गावर दोन ट्रकनं एकमेकांना समोरासमोर येऊन धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर पाच जण जखमी असल्याचं समजतंय. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

ट्रकनं तिघांना चिरडलं
धुळे जिल्ह्यातल्या मुंबई - आग्रा महामार्गावर एका ट्रकनं तीन जणांना चिरडलं. धुळे शहर बायपास मार्गालगत हा अपघात झाला. त्यात ट्रक  झोपडती घुसल्यानं हा अपघात झाला. 

गाडी नीरा नदीत कोसळली
पुणे जिल्ह्यातील भोर जवळ अल्टो कार नदीत कोसळून पाच जण ठार झालेत. मृतांमध्ये दोन महिला आणि लहान मुलीचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसले कुटुंबियावर काळानं घाला घातलाय. महाडकडून पुण्याकडे येत असताना अपघात होऊन अल्टो कार नीरा नदीत कोसळली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.