शिवसेनेनं खिशातले राजीनामे बाजूला ठेवले!

महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते.

Updated: Mar 5, 2017, 06:46 PM IST
शिवसेनेनं खिशातले राजीनामे बाजूला ठेवले! title=

मुंबई : महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. पण आता मात्र आम्ही खिशातले राजीनामे बाजूला काढून ठेवले आहेत, असं वक्तव्य पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलं आहे. उपलोकायुक्त हा विषय फक्त मुंबईसाठी नाही तर इतर महापालिकांसाठीही आहे. मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केल्याचंही कदम म्हणाले. तसंच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांचं वजन वापरावं अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे.