वाळू माफिया टोळक्याचा ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला

सांगलीत तासगाव तालुक्यातील राजापूर इथं वाळू माफियांनी ग्रामस्थांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. जवळपास पन्नास जणांच्या टोळक्यानं ग्रामस्थांवर हल्ला केला.

Updated: Nov 23, 2014, 09:02 AM IST
वाळू माफिया टोळक्याचा ग्रामस्थांवर प्राणघातक हल्ला title=

तासगाव : सांगलीत तासगाव तालुक्यातील राजापूर इथं वाळू माफियांनी ग्रामस्थांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. जवळपास पन्नास जणांच्या टोळक्यानं ग्रामस्थांवर हल्ला केला.

खोरे, काठ्या आणि दगडांनी केलेल्या या हल्ल्यात सहा जण जखमी झालेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. राजापूरमध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या वाळू उपशाबाबत ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी येरळा बचाव कृती समिती स्थापन केली.

या समितीतील काही जणांनी मध्यरात्री वाळू उपसा करणा-यांना रोखलं. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. या  प्रकरणी  तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, राजकीय वजन वापरुन अशाप्रकारे बेकायदेशीर वाळू उपसा राजरोसपणे सुरु असल्याचं भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी म्हटलंय.. तसंच या प्रकरणी दोषींची गय केली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.