'जातीयवादी म्हणणारे भाजपच्या पंगतीत तोंड खरखटं करून गेले'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर मिश्किल भाषेत टीका केली आहे. रावसाहेब दानवे जाहीर सभेत बोलताना म्हणाले, 'पप्पू म्हणजे राहुल गांधी, ते पंतप्रधान मोदींवर टिका करतात, मनमोहन सिंह यांना कधीच लोकसभेत  बोलले पहिल नाही, सोनिया गांधी तर चिट्ठी वाचून श्रद्धांजली अर्पण करतात, यांना राजकारणाचं काय कळतं.'

Updated: Aug 16, 2016, 12:09 AM IST
'जातीयवादी म्हणणारे भाजपच्या पंगतीत तोंड खरखटं करून गेले' title=

वर्धा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर मिश्किल भाषेत टीका केली आहे. रावसाहेब दानवे जाहीर सभेत बोलताना म्हणाले, 'पप्पू म्हणजे राहुल गांधी, ते पंतप्रधान मोदींवर टिका करतात, मनमोहन सिंह यांना कधीच लोकसभेत  बोलले पहिल नाही, सोनिया गांधी तर चिट्ठी वाचून श्रद्धांजली अर्पण करतात, यांना राजकारणाचं काय कळतं.'

 यावेळी भाजपला जातीयवादी पक्ष म्हणणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांवरही टीका केली. 'शरद पवार, मायावती, लालूप्रसाद, यांनी कधीना कधी भारतीय जनता पक्षासोबत युती केली आहे. नितीशकुमार भाजपला जातीयवादी म्हणतात. पण जे जे भाजपला जातीवादी म्हणतात, ते भारतीय जनता पक्षाच्या पंगतीत तोंड खरखट करून गेले आहेत, त्यामुळे त्यांना भाजपला जातीयवादी म्हणण्याचा काहीच अधिकार नाही.'

सोनिया गांधींवर टीका करताना, पुस्तकात पाहून खिचडी शिजत नाही, तर देश कसा चालवायचा ? असा प्रश्नही दानवेंनी यावेळी उपस्थित केला.